शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या आठ दिवसांपासून आगीच्या ज्वाळांनी धुमसतोय ‘सातपुडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव - जिल्ह्याला लाभलेल्या अलौकीक नैसगिक सौदर्यांचा खजिना असलेला सातपूडा गेल्या आठ दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव - जिल्ह्याला लाभलेल्या अलौकीक नैसगिक सौदर्यांचा खजिना असलेला सातपूडा गेल्या आठ दिवसांपासून आगीच्या ज्वाळांनी धुमसतोय, गेल्या आठ दिवसात चोपडा तालुक्यातील विष्णापुर, वराड क्षेत्रासह अडावद वनक्षेत्रातील चिंचपाणी, वर्डी, वरगव्हाण भागातील सुमारे ८०० हेक्टर क्षेत्राचे जंगल जळून खाक झाले आहे. यामध्ये शेकडो सरपटणाऱ्या जिवांसह अनेक पक्ष्यांचे घरटे देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहे. मोठ्या क्षेत्रावर लागलेली आग आटोक्यात आणण्यास वन विभागाला अपुर्ण मनुष्यबळामुळे अपयश येत आहे. दिवसागणिक ही आग वाढत असून, आता आग विझविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील यंत्रणा तयार करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

जळगाव जिल्ह्याला सुमारे ११० ते १२० किमीचा सातपूडा पर्वताची वनसंपदा लाभलेली आहे. वाघ, बिबट्या, अस्वलासह असंख्य व दुर्मीळ वनस्पतींचा हा सातपुडा एक खजिना आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अतिक्रमण, शिकारी, वृक्षतोड व अशाप्रकारे लागणाऱ्या आगींमुळे हा ही वनसंपदा नष्ट होण्याचा मार्गावर आहे. वन विभागाकडून प्रयत्न केले जात असले तरी कमी मनुष्यबळामुळे ही वनसंपदा वाचविण्यासाठीचे प्रयत्न कमी पडत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सातपुड्यातील वैजापुर व अडावद या दोन्ही वनविभागात आगी लागल्या आहेत. वनविभागाकडील कमी मनुष्यबळामुळे ही आग आटोक्यात आणण्यास अपयश येत आहे.

आग लागण्याचे ही असू शकतात कारणे

१. जिल्ह्यात वनक्षेत्रात एप्रिल व मे महिन्यात वणवे पेटत असतात. अनेकदा हे वणवे उन्हामुळे पेटतात. मात्र, फेब्रुवारी व मार्च महिन्यातच हे वणवे लागणे शक्य नसल्याने हे वणवे मानवनिर्मीत असण्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

२. सातपुड्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणधारकांकडून ही आग लावली गेल्याची शक्यता आहे.

३. या काळात सातपुड्यात अनेकांकडून डींक काढण्याचे काम केले जाते. या कामादरम्यान वन्यजीवजवळ येवू नये म्हणून देखील ही आग लावली गेल्याची शक्यता आहे.

४. वरगव्हाण, बिडगाव, चिंचपाणी भागात काही दिवसांपुर्वी अस्वल आल्याची अफवा पसरली होती. या अस्वलाच्या भितीने सातपूड्यात गुर-ढोरं चरण्यासाठी घेवून गेलेल्यांनी आग लावली असल्याचीही शक्यता आहे.

५. सातपुड्यात गेल्या काही वर्षांपासून मानवी हस्तक्षेप वाढत आहे. या जंगलामध्ये जावून पार्ट्या करणे, सिगारेट ओढणे असे प्रकार चालतात. त्यातून ही आग लावली गेल्याचाही संशय आहे.

सुमारे ५० किमीवरून दिसतोय वणवा

अडावद वनक्षेत्रातील सातपुड्याची उंची सुमारे ४०० ते ८०० मीटर पर्यंत आहेत. त्यामुळे या भागात लागलेले वणवे इतके मोठे आहेत की रात्रीच्या वेळेस सुमारे ५० किमी दुर वरून देखील दिसत आहेत. या आगीमुळे परिसरातील गावांमधून सातपूड्यात दिवसा धुरीचे लोट तर रात्रीच्या वेळेस आगीच्या ज्वाळा दिसून येत आहे.

७० कर्मचाऱ्यांवर हजारो क्षेत्राचा व्याप

आग विझविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जिकरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, केवळ ७० कर्मचाऱ्यांवर सुमारे ५ ते ७ हजार हेक्टर जंगलाचा व्याप आहे. वैजापुर वनक्षेत्रात एकूण ३० तर अडावद वनक्षेत्रात ४० असे एकूण ७० कर्मचारी आहेत. सातपुड्याचा उंच शिखरांवर ही आग लागली असून, तीथपर्यंत जाण्यासाठीही वन कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या त्याठिकाणी पोहचणे शक्यच नाही. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना झाडाच्या फांद्यापासून ही आग विझवावी लागत आहे.

शेकडो वन्यजीवांचा मृत्यू

आठ दिवसांपासून लागलेल्या आगीत शेकडो सरपटणाऱ्या प्राण्यांसह अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. तसेच शेकडो दुर्मीळ वनस्पती व मोठी वनसंपदा देखील या आगीत जळून खाक झाली आहे.

कोट..

विष्णापुर भागात ही आग लागली असून, ही आग विझविण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आग ही मानवनिर्मीत असून, त्याचा शोध देखील वनविभागाकडून घेतला जात आहे.

-समाधान सोनवणे, प्रादेशिक वन अधिकारी , वैजापुर

वरगव्हाण व उनपदेवच्या वरील भागात ही आग लागली आहे. आगीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी काढली जात आहे. अजूनही मोठ्या भागात आग कायम असून, ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

-विक्रम पदमोर, प्रादेशिक वन अधिकारी, अडावद