शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान शनिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:45 IST

पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळा मार्गात व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

ठळक मुद्देव्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्पमहाराष्ट्रातून शेकडो दिंड्या येतात३३ दिवसांचा ७५० कि.मी. पायी प्रवासवारीत पायी चालताना कायीक, वाचिक व मानसिक तपखान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने असते

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळा मार्गात व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.महाराष्ट्रातून शेकडो दिंड्याया संतोक्तीनुसार वारकरी संप्रदायात परंपरेने चालत आलेल्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या पालख्यासह निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाइर्, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे मानाचे सात पालखी सोहळे त्यांच्या समाधीस्थळावरून जात असतात. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई पालखी ३१० वर्षे पासून अविरत नेण्याची परंपरा लाभली असून, यावर्षी वैष्णवांच्या मेळ्यासह ८ जून रोजी मुक्ताबाई पालखी प्रस्थान करणार आहे. ३३ दिवसांचा ७५० कि.मी. प्रदीर्घ पायी प्रवास करत १० जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल.वारीत पायी चालताना कायीक, वाचिक व मानसिक तप होत असल्याने हजारो वारकरी सोहळ्यात सामील होतात. यामध्ये खान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने असतात. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यातील १८ तालुके व तिनशेवर गावे दिंडी सोहळा मार्गात येतात. या गावात व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी निश्चितच अल्पसा प्रयत्न म्हणून यावर्षी संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर प्रत्येक गावागावात तरूणांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून परावृत्त होण्याची शपथ देवून माळकरी बनविण्यात येणार आहे. याकामी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीचा जागर राबविण्यात येणार आहे.सोहळ्याची जय्यत तयारीनाचणखेडा, जि.बुरहानपूर येथील प्रकाश रामू पाटील यांना रथाकरिता बैलजोडीचा मान सलग सातव्या वर्षी मिळाला असून ६ रोजी विधिवत पूजन करून बैलजोडी संस्थानमध्ये दाखल होईल. सध्या रथाची पॉलीस , पताका बनविणे, पुजेचे साहीत्य आदि सामानाची जुळवाजुळव तयारी जोरात चालू आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पालखी मार्गात पाण्याचे टँकर शासनाने वाढवून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.यंदाचे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. तसेच प्रस्थान सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव जुनारे यांनी केले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर