शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान शनिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:45 IST

पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळा मार्गात व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

ठळक मुद्देव्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्पमहाराष्ट्रातून शेकडो दिंड्या येतात३३ दिवसांचा ७५० कि.मी. पायी प्रवासवारीत पायी चालताना कायीक, वाचिक व मानसिक तपखान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने असते

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : पंढरीच्या वारीसाठी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळ्यापैकी ३१० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मुक्ताई समाधी स्थळावरून आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर शनिवारी, ८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यावर्षी पालखी सोहळा मार्गात व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.महाराष्ट्रातून शेकडो दिंड्याया संतोक्तीनुसार वारकरी संप्रदायात परंपरेने चालत आलेल्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या पालख्यासह निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाइर्, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे मानाचे सात पालखी सोहळे त्यांच्या समाधीस्थळावरून जात असतात. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई पालखी ३१० वर्षे पासून अविरत नेण्याची परंपरा लाभली असून, यावर्षी वैष्णवांच्या मेळ्यासह ८ जून रोजी मुक्ताबाई पालखी प्रस्थान करणार आहे. ३३ दिवसांचा ७५० कि.मी. प्रदीर्घ पायी प्रवास करत १० जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल.वारीत पायी चालताना कायीक, वाचिक व मानसिक तप होत असल्याने हजारो वारकरी सोहळ्यात सामील होतात. यामध्ये खान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने असतात. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यातील १८ तालुके व तिनशेवर गावे दिंडी सोहळा मार्गात येतात. या गावात व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी निश्चितच अल्पसा प्रयत्न म्हणून यावर्षी संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर प्रत्येक गावागावात तरूणांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून परावृत्त होण्याची शपथ देवून माळकरी बनविण्यात येणार आहे. याकामी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीचा जागर राबविण्यात येणार आहे.सोहळ्याची जय्यत तयारीनाचणखेडा, जि.बुरहानपूर येथील प्रकाश रामू पाटील यांना रथाकरिता बैलजोडीचा मान सलग सातव्या वर्षी मिळाला असून ६ रोजी विधिवत पूजन करून बैलजोडी संस्थानमध्ये दाखल होईल. सध्या रथाची पॉलीस , पताका बनविणे, पुजेचे साहीत्य आदि सामानाची जुळवाजुळव तयारी जोरात चालू आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पालखी मार्गात पाण्याचे टँकर शासनाने वाढवून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.यंदाचे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. तसेच प्रस्थान सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव जुनारे यांनी केले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर