शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पाणी टंचाई निवारार्थ उपायोयोजना

By admin | Updated: May 6, 2017 13:14 IST

नगरपालिकेने दुस:या आवर्तनासाठी 10 लाख रूपये हतनूर प्रकल्पाकडे भरले आहेत.

ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 6 - संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक येत असतात. यात्रोत्सवादरम्यान पाण्याची टंचाई भासू नये म्हणून नगरपालिकेने दुस:या आवर्तनासाठी 10 लाख रूपये हतनूर प्रकल्पाकडे भरले आहेत. 8 रोजी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली.पहिल्या आवर्तनाचे पाणी 15 मे र्पयत  पुरणार हेते. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. यात्रोत्सवात भाविकाचे हाल होऊ नयेत, तसेच नागरिकांकडे येणा:या पाहुण्यांसाठी पुरेसे पाणी मिळावे म्हणून पाण्याचे दिवस न वाढवता, 10 लाख रूपये भरून आवर्तनाद्वारे पाणी घेण्यात येत आहे.एका आवर्तनात 3.76 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी मिळते.पाण्याचे ऑडीटमाजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर शहराला पुरवल्या जाणा:या पाण्याचे ऑडीट केले आहे. दररोज पाणी पुरवठा होऊ शकतो, एवढे पाणी तापी नदीतून घेते जात असतांना, शहराला तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा का होतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.अंबर्षी टेकडीवरील 340 अश्वशक्ती पंपातून 5 लाख 2 हजार लीटर पाणी ताशी या वेगाने 20 तासात 1 कोटी 40 हजार लिटर पाणी तर, गांधली येथील 275 अश्वशक्ती पंपावरून ताशी 5 लाख 20 हजार लिटर याप्रमाणे 20 तासात 1 कोटी 4 लाख लिटर असे एकूण 2 कोटी लिटर पाणी दररोज अमळनेरात येते. त्यापैकी 50 लाख लिटर पाणी वाया जाते असे गृहित धरल्यास दीड कोटी लिटर पाणी  येते. अमळनेर शहराची लोकसंख्या 1 लाख आहे. माणसी 70 ते 135 लिटर पाणी देण्याचा नियम असल्याने, दररोज शहराला 70 ते जास्तीत जास्त 1 कोटी 35 लाख लिटर पाटी लागते. मात्र रोज दीड कोटी लिटर पाणी येते, तरीही शहराला 3-4 दिवसाआड पाणी का मिळते असा प्रश्न माजी आमदार साहेबराव पाटील यांनी विचारला आहे. या मागे बोगस नळ कनेक्शन, दादागिरीने जादा पाणी सोडायला लावणे, नळाच्या तोटय़ा सुरूच ठेवणे,  वाहने धुणे, आदी कारणे असून, ते बंद करण्याची मागणी केली आहे.