शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:26 IST

तिघांना अटक

ठळक मुद्देसतत ट्रॅक्टर व डंपर पळविण्यामागे गौडबंगाल काय?

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातून सात ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री साडे दहा वाजता पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर पळविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी मोहसीन खान अय्युब खान (२०, रा.शाहू नगर, जळगाव), शेख शाहीद शेख शब्बीर (२९, रा. हुडको, पिंप्राळा) व महेंद्र सुधाकर सपकाळे (२७, रा.सावखेडा, ता. जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.म्हसावद मंडळाधिकाऱ्यांच्या पथकाने एक ब्रास वाळूसह एक ट्रॅक्टर पकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावले होते. या ट्रॅक्टर मालकाला नोटीसही बजावण्यात आलेली होती, असे असताना शनिवारी रात्री साडे दहा वाजता दोन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून ट्रॅक्टर पळवून नेले. हे ट्रॅक्टर व दोन दुचाकी (क्र.एम.एच.१९ टी.५१६५ व एम.एच.१९ सी.डी.१०५१) तलाठी रमेश वंजारी यांना पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे आढळून आले. तेथे मोहसीन, शाहीद व महेंद्र असे तिघं आढळून आले.याप्रकरणी रात्री तिघांविरुध्द ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी तपासी अमलदार महेंद्र बागुल व सहकाºयांनी अटक केली. दरमयान, तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.का घडताहेत वाहने पळविण्याचे प्रकारजिल्हाधिकारी कार्यालय आवारातून सात ट्रॅक्टर पळविल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यानंतर दुसºयाच दिवशी आणखी एक डंपर पळविण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारी एक ट्रॅक्टर पळविण्यात आले. गुरुवारपासून सलग तीन दिवस वाहने पळविले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयातून तेही सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक असताना वाळूचे वाहने पळविले जात असतील तर इतर ठिकाणी वाहने कसे सुरक्षित राहतील. काही महिन्यापूर्वी तहसील कार्यालयातूनही वाहने पळविण्यात आली. वारंवार याच दोन्ही कार्यालयातून वाहने पळविले जात असल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची ओरड होत आहे.