शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

वाळू लिलावाला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:22 IST

विश्लेषण

सुशील देवकर जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाला अखेर मुहूर्त लागला असून पहिल्या टप्पात २१ वाळूगटांसाठी व त्यापाठोपाठ ३ वाळू गटांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाळूची टंचाई दूर होण्यास मदत होणार असून वाळूचोरीमुळे बुडणारा महसूलही वसुल होऊ शकणार आहे. मात्र आता त्यातील किती वाळू गटांना प्रतिसाद मिळतो? किती वाळू ठेक्यांना नव्याने निविदा मागवाव्या लागतात? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मात्र त्या तुलनेत कारवाई मात्र होताना दिसत नाही. वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला असताना अधिकृत व अनधिकृत वाळू वाहतूक ओळखणे कठीण जाते. त्यावेळी वाहन अडवूनच त्याची खात्री करावी लागते. मात्र वाळू ठेके बंद असताना होणारी वाळू वाहतूक ही अवैध असल्याचे स्पष्ट असतानाही जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून कारवाईकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले. वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पुन्हा तीन ट्रॅक्टर पळवून नेल्याच्या घटनेने महसूल प्रशासनाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच वाळूची जप्त केलेली वाहने पळवून नेण्याच्या एका महिन्यात तब्बल तीन घटना घडल्या. त्यापूर्वी तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलुप तोडूनही जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले होते. तरीही असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यावर नव्यानेच पदभार स्विकारलेल्या जिल्हाधिकाºयांनी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच वाळू चोरी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे तरी जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा व अवैध वाहतूक होणार नाही, अशी अपेक्षा आहे.