शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

वाळू लिलावाला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:22 IST

विश्लेषण

सुशील देवकर जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाला अखेर मुहूर्त लागला असून पहिल्या टप्पात २१ वाळूगटांसाठी व त्यापाठोपाठ ३ वाळू गटांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाळूची टंचाई दूर होण्यास मदत होणार असून वाळूचोरीमुळे बुडणारा महसूलही वसुल होऊ शकणार आहे. मात्र आता त्यातील किती वाळू गटांना प्रतिसाद मिळतो? किती वाळू ठेक्यांना नव्याने निविदा मागवाव्या लागतात? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मात्र त्या तुलनेत कारवाई मात्र होताना दिसत नाही. वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला असताना अधिकृत व अनधिकृत वाळू वाहतूक ओळखणे कठीण जाते. त्यावेळी वाहन अडवूनच त्याची खात्री करावी लागते. मात्र वाळू ठेके बंद असताना होणारी वाळू वाहतूक ही अवैध असल्याचे स्पष्ट असतानाही जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून कारवाईकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले. वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पुन्हा तीन ट्रॅक्टर पळवून नेल्याच्या घटनेने महसूल प्रशासनाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच वाळूची जप्त केलेली वाहने पळवून नेण्याच्या एका महिन्यात तब्बल तीन घटना घडल्या. त्यापूर्वी तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलुप तोडूनही जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले होते. तरीही असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यावर नव्यानेच पदभार स्विकारलेल्या जिल्हाधिकाºयांनी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच वाळू चोरी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे तरी जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा व अवैध वाहतूक होणार नाही, अशी अपेक्षा आहे.