शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वाळू लिलावाला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:22 IST

विश्लेषण

सुशील देवकर जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाला अखेर मुहूर्त लागला असून पहिल्या टप्पात २१ वाळूगटांसाठी व त्यापाठोपाठ ३ वाळू गटांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाळूची टंचाई दूर होण्यास मदत होणार असून वाळूचोरीमुळे बुडणारा महसूलही वसुल होऊ शकणार आहे. मात्र आता त्यातील किती वाळू गटांना प्रतिसाद मिळतो? किती वाळू ठेक्यांना नव्याने निविदा मागवाव्या लागतात? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मात्र त्या तुलनेत कारवाई मात्र होताना दिसत नाही. वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला असताना अधिकृत व अनधिकृत वाळू वाहतूक ओळखणे कठीण जाते. त्यावेळी वाहन अडवूनच त्याची खात्री करावी लागते. मात्र वाळू ठेके बंद असताना होणारी वाळू वाहतूक ही अवैध असल्याचे स्पष्ट असतानाही जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून कारवाईकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले. वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पुन्हा तीन ट्रॅक्टर पळवून नेल्याच्या घटनेने महसूल प्रशासनाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच वाळूची जप्त केलेली वाहने पळवून नेण्याच्या एका महिन्यात तब्बल तीन घटना घडल्या. त्यापूर्वी तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलुप तोडूनही जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले होते. तरीही असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यावर नव्यानेच पदभार स्विकारलेल्या जिल्हाधिकाºयांनी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच वाळू चोरी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे तरी जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा व अवैध वाहतूक होणार नाही, अशी अपेक्षा आहे.