शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

'सैराट झालं जी'... एकाच वर्षात जिल्ह्यातील ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 12:22 IST

जळगाव : प्रेम प्रकरण असो अथवा फूस लावून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून ९९६ मुली सैराट झाल्या असून त्यासोबत ६५८ पालकांनीही ...

जळगाव : प्रेम प्रकरण असो अथवा फूस लावून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून ९९६ मुली सैराट झाल्या असून त्यासोबत ६५८ पालकांनीही आपला मुलगा पळून गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यात विवाहित महिला व नवविवाहित तरुणींचाही समावेश आहे. असे असले तरी ७४५ मुली तर ३२३ मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २५१ मुलींचा शोध लागलेला नाही.

जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत ४ हजार ८२८ हरविलेल्या, पळविलेल्या महिला व मुलींची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो, त्यामुळे ही संख्यादेखील कमी नाही. बहुतांश प्रकरणात महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते.

दरम्यान, परत आलेल्या महिला व मुलींनी आपल्या घरी परत न जाता प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. अपवादात्मक परिस्थितीत महिला व मुली माघारी कुटुंबाकडे गेलेल्या आहेत. हरवलेल्या व पळविलेल्या एकूण महिला व मुलींची पाच वर्षातील संख्या ४ हजार २२८ इतकी असून त्यापैकी ३ हजार ५२२ महिला व मुली परत आलेल्या आहेत. १ हजार ३०६ महिला व मुली अद्यापही परत आलेल्या नसल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. दरम्यान, एप्रिल ते जुलै या कोरोनाच्या चार महिन्यात ११३ मुलींनी पलायन केले आहे.

कोणत्या महिन्यात किती मुली सैराट

जानेवारी -१०२

फेब्रुवारी -१०७

मार्च -८७

एप्रिल -१२

मे -१९

जून -३४

जुलै -६८

ऑगस्ट -११०

सप्टेंबर -१२२

ऑक्टोबर -१११

नोव्हेंबर -९७

डिसेंबर -१२७

कोणत्या वर्षात किती?

२०१८ : ८३१

२०१९ : ९८२

२०२० : ९९६

२५१ मुलींचा शोध लागेना

गेल्या वर्षी जिल्ह्यातून पलायन केलेल्या ९९६ पैकी ७४५ मुलींचा शोध लागला आहे तर २५१ मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. ज्या मुलींचा शोध लागला आहे, त्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या बहुतांश मुलींनी पालकासोबत जाण्यास नकार दिला आहे तर १८ वर्षाच्या खालील मुलीही काही बालनिरीक्षणगृहात तर काही मुली पालकांकडे गेल्या आहेत.

६५८ मुलेही बेपत्ता

जिल्ह्यातून मुलींसोबतच ६५८ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षाच्या आतील ६५ मुलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यापैकी ३२३ मुलांचा शोध लागलेला आहे. यातील बहुतांश मुले ही पालकांकडे गेली आहेत. मुलांच्या पालकांनी मुलींचा स्वीकार केला आहे. काही जणांना तर दोघांच्याही पालकांनी नाकारले, त्यामुळे त्यांनी जिल्हा सोडून इतरत्र संसार थाटला आहे.

कोट....

मुले, मुली यांचे पलायन हा चिंतेचा विषय आहे. आपला पाल्य काय करतो, याकडे पालकांनीच सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस आपले काम करतीलच. अनेक मुले, मुली शोधूनही आणल्या आहेत. मात्र काही बाबतीत कायद्याने हात बांधलेले असतात. सज्ञान नसलेले मुलं, मुली पालकांच्याच स्वाधीन केलेले आहेत. मुलामुलींचे विषय आपण स्वत:च गांभीर्याने घेऊन पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.

- डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक