शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

साकेगावचा न्याय ममुराबादच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: ग्रामनिधी व पाणीपट्टी वसुलीची सुमारे सात लाख रूपयांची रक्कम बँकेत न भरता परस्पर खर्च केल्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: ग्रामनिधी व पाणीपट्टी वसुलीची सुमारे सात लाख रूपयांची रक्कम बँकेत न भरता परस्पर खर्च केल्याच्या आरोपावरून ग्रामपंचायतीच्या तत्कालिन ग्रा.वि.अधिकाऱ्यांसह प्रभारी सरपंचांना पंचायत समितीने जबाबदार धरल्यानंतरही जिल्हा परिषदेने अडीच वर्षांपासून कारवाईत चालढकल केली आहे. दरम्यान, साकेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रा.वि. अधिकाऱ्याला त्याच कारणांवरून निलंबित करण्यात आल्याने तो न्याय ममुराबाद ग्रामपंचायतीला का नाही, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

ममुराबाद ग्रामपंचायतीच्या तत्कालिन १३ सदस्यांनी मार्च २०१८ मध्ये जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनुसार ग्रामनिधी व पाणीपट्टी करांच्या वसुलीतून जमा होणारी रक्कम बँकेत भरणा न करता परस्पर खर्च करण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्याची चौकशी पंचायत समितीने केल्यानंतर ग्रामनिधी रोकड वहीतील नोंदीनुसार नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सुमारे पाच लाख २९ हजार ८५१ रूपये वसूल झाले होते. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी बँक खात्यात फक्त दोन लाखांचा भरणा करण्यात आला. उर्वरित वसूल रक्कम तीन लाख २८ हजार ७०१ रूपये बँक खाती भरणा न करता परस्पर रोखीने खर्च करण्यात आली होती. तसेच पाणीपट्टी निधी रोकड वहीतील नोंदीनुसार नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सुमारे तीन लाख ७८ हजार ६३० रूपये वसूल झाले होते. मात्र, संबंधितांनी संपूर्ण रक्कम बँक खाती भरणा न करता परस्पर रोखीने खर्च केल्याचे दिसून आले होते.

---------------------

- सुमारे सात लाख सात हजार ३३१ रूपये रकमेचा नियमबाह्य खर्च केल्याचा ठपका ठेवून ग्रामपंचायत अधिनियमानुसार तत्कालिन तत्कालिन व विद्यमान ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांना सुमारे तीन लाख ८८ हजार रूपयांच्या नियमबाह्य खर्चास, ग्रामविकास अधिकारी जी.डी.काळे यांना एक लाख ८२ हजार ६२७ रूपयांच्या नियमबाह्य खर्चास तसेच तत्कालिन प्रभारी सरपंचांना एक लाख ३६ हजार ६९७ रूपयांच्या नियमबाह्य खर्चास जबाबदार धरण्यात आले आहे.

- जळगावच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी मे २०१८ मध्ये पाठविण्यात आला होता. प्रत्यक्षात आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई आजतागायत जिल्हा परिषदेकडून होऊ शकलेली नाही. त्याबद्दल तक्रारदार सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारासुद्धा दिला आहे.