शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:43 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेंड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी ’ या सदरात प्रा.डॉ. विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव टाकळी येथे 18 मार्च 1915 रोजी शंकर महाराजांचा जन्म झाला. या गावात आदिवासी समाजाचे एकुलते एक घर होते. त्यांच्या वडिलांना नऊ एकराचा एक तुकडा इनाम दाखल मिळाला होता. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपले. शंकर महाराज पोरके झाले पण समाजाचे पोरकेपण दूर केले. एकाकी महाराज मामांकडे वाढले. गावची चाकरी करावी आणि भाकरी मागून खावी असा दिनक्रम होता. वयाच्या 13 वर्षार्पयत हे असे सुरू होते. वयाच्या चौदाव्या वर्षी महाराजांना विरक्तीने घेरले. शिरसगाव येथील रहिवासी दादाभाऊ पाटील यांच्या मळ्यात औदुंबराच्या वृक्षाखाली महाराजांनी निवास केला. पुनश्च गावात न परतण्याचा निश्चय केला. तेथेच एक कुटी बांधली. औदुंबराखाली तपाचरणाला आरंभ झाला. कुणाला काही देणे नाही आणि कुणापाशी काहीही मागणे नाही हा आरंभापासूनचा शिरस्ता होता. वेळेवर कुणी काही आणून दिले तर भले, नाही दिले तरी भले अशी वृत्ती होती. जे मिळेल ते अन्नब्रrा म्हणून सेवन करायचे असा थाट होता. दादाभाऊ पाटील यांचे धाकटे बंधू तुकाराम पाटील त्यांना भोजन आणून देत असत. महाराज अपरिग्रही वृत्तीने राहात. भल्या पहाटे उठावे, गार पाण्याचे स्नान करावे. संत तुकोबा-नामदेव महाराजांचे अभंग म्हणावेत. महाराजांचा आवाज सुरेल होता. ते उत्तम चित्रे काढत असत. बासरी तर विलक्षण एकाग्रतेने वाजवत असत. त्या स्वरांनी उभे रान वेडावून जाई. सर्वत्र नामघोषाचा अमृतध्वनी विहरत राही. महाराजांचे अक्षर वाटोळे, सुंदर आणि चित्रात्मक शैलीचा एक नमुना म्हणता येईल. रानात ते निर्भयपणे एकटेच राहात. आत्मसाक्षात्काराच्या प्रसंगाचे वर्णन करताना महाराजांच्या लेखणीचे आद्र्र होणे स्वाभाविक आहे. ते म्हणतात ‘शके 1857 साली माघ महिन्यात कृष्ण पक्षातील विजया स्मार्त एकादशी रोज मंगळवार ते दिवशी ईश्वरभक्त शंकर हा रात्री ईश्वराचे ध्यान करता बसला होता. अर्धी रात्र झाली होती. मला साक्षात दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला.’ आपल्या जन्म आणि चरित्राबद्दल महाराज असे म्हणत असत, ‘रामावतारात सीतेचा शोध करीत असताना प्रभू रामचंद्रांना वाटेत शबरी भिल्लीणीचा आश्रम लागला. शबरीने रामाला आश्रमात बोलावले. तिने बोरे खाण्यास दिली. जाताना तिला विचारले, ‘तुला कायम हवे ते मागून घे.’ तिने काहीच मागितले नाही करिता तिच्या कुळात जन्म घेऊन रामभक्ती करून तिचे ऋण फेडले. त्या करताच मला या काळात तिच्या कुळात जन्म घ्यावा लागला.’ शंकर महाराजांचे आत्मचरित्र काही केवळ चमत्कारिक कथाप्रसंगांनी भरलेले चरित्र नाहीये. यात ज्ञान विज्ञान, भाषोत्पत्ती, सृष्टी रहस्य, साधूलक्षणे याशिवाय देवदेवतादिकांच्या पृथ्वीतलावर अनेक उपयुक्त, तर्कसंगत आणि प्रत्ययकारी कथा आहेत. यात चौदा भुवनांची नावे आहेत. चौसष्ठ कलांची सुसूत्र यादी आहे. हे एक अतिशय मनोरम संवादात्मक पद्म आहे. यात कलियुगाचे केलेले वर्णन अतिशय उचित आहे. महाराज कलियुगाचे असे वर्णन करतात, ‘कलियुग येताच केवळ शंभर निमिषे आयुष्य राहील.’ शंभर निमिष म्हणजे मृत्यूलोकाची शंभर वर्षे असतील. आता हिरव्या पक्षाच्या पोटी मोत्ये उत्पन्न होतात पण कलियुगात कली लागताच मोत्ये नष्ट होऊन समुद्रात उत्पन्न होतील.’ कलियुगाचे वर्णन हे पुराणांतर्गत येणारे एक लोकविलक्षण असे प्रकरण आहे.महाराजांच्या आत्मचरित्रातील एका मनोरम कवितेच्या काही ओळी उद्धृत करून महाराजांच्या परिनिर्वाणाची चर्चा करू या. तेव्हा नारण म्हणे जी शंकरा। तरुण असताही दिसतोसी म्हातारा हे न कळे मज द्विकंठेश्वरा मग इथे नरा काही न कळे । कोण जाणे कैसी गती ही न कळे मजप्रती काय वणरू मायापती सांग आता महाराजांनी योगसामथ्र्याने वृद्धत्व पांघरून घेतले होते. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी 21 जुलै 1945 आषाढ शुद्ध एकादशीदिनी ब्राrामुहूती 8महाराज ब्रrालीन झाले. शहादा तालुक्यातील मनरद येथे त्यांची समाधी आहे.