शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:43 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेंड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी ’ या सदरात प्रा.डॉ. विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव टाकळी येथे 18 मार्च 1915 रोजी शंकर महाराजांचा जन्म झाला. या गावात आदिवासी समाजाचे एकुलते एक घर होते. त्यांच्या वडिलांना नऊ एकराचा एक तुकडा इनाम दाखल मिळाला होता. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपले. शंकर महाराज पोरके झाले पण समाजाचे पोरकेपण दूर केले. एकाकी महाराज मामांकडे वाढले. गावची चाकरी करावी आणि भाकरी मागून खावी असा दिनक्रम होता. वयाच्या 13 वर्षार्पयत हे असे सुरू होते. वयाच्या चौदाव्या वर्षी महाराजांना विरक्तीने घेरले. शिरसगाव येथील रहिवासी दादाभाऊ पाटील यांच्या मळ्यात औदुंबराच्या वृक्षाखाली महाराजांनी निवास केला. पुनश्च गावात न परतण्याचा निश्चय केला. तेथेच एक कुटी बांधली. औदुंबराखाली तपाचरणाला आरंभ झाला. कुणाला काही देणे नाही आणि कुणापाशी काहीही मागणे नाही हा आरंभापासूनचा शिरस्ता होता. वेळेवर कुणी काही आणून दिले तर भले, नाही दिले तरी भले अशी वृत्ती होती. जे मिळेल ते अन्नब्रrा म्हणून सेवन करायचे असा थाट होता. दादाभाऊ पाटील यांचे धाकटे बंधू तुकाराम पाटील त्यांना भोजन आणून देत असत. महाराज अपरिग्रही वृत्तीने राहात. भल्या पहाटे उठावे, गार पाण्याचे स्नान करावे. संत तुकोबा-नामदेव महाराजांचे अभंग म्हणावेत. महाराजांचा आवाज सुरेल होता. ते उत्तम चित्रे काढत असत. बासरी तर विलक्षण एकाग्रतेने वाजवत असत. त्या स्वरांनी उभे रान वेडावून जाई. सर्वत्र नामघोषाचा अमृतध्वनी विहरत राही. महाराजांचे अक्षर वाटोळे, सुंदर आणि चित्रात्मक शैलीचा एक नमुना म्हणता येईल. रानात ते निर्भयपणे एकटेच राहात. आत्मसाक्षात्काराच्या प्रसंगाचे वर्णन करताना महाराजांच्या लेखणीचे आद्र्र होणे स्वाभाविक आहे. ते म्हणतात ‘शके 1857 साली माघ महिन्यात कृष्ण पक्षातील विजया स्मार्त एकादशी रोज मंगळवार ते दिवशी ईश्वरभक्त शंकर हा रात्री ईश्वराचे ध्यान करता बसला होता. अर्धी रात्र झाली होती. मला साक्षात दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला.’ आपल्या जन्म आणि चरित्राबद्दल महाराज असे म्हणत असत, ‘रामावतारात सीतेचा शोध करीत असताना प्रभू रामचंद्रांना वाटेत शबरी भिल्लीणीचा आश्रम लागला. शबरीने रामाला आश्रमात बोलावले. तिने बोरे खाण्यास दिली. जाताना तिला विचारले, ‘तुला कायम हवे ते मागून घे.’ तिने काहीच मागितले नाही करिता तिच्या कुळात जन्म घेऊन रामभक्ती करून तिचे ऋण फेडले. त्या करताच मला या काळात तिच्या कुळात जन्म घ्यावा लागला.’ शंकर महाराजांचे आत्मचरित्र काही केवळ चमत्कारिक कथाप्रसंगांनी भरलेले चरित्र नाहीये. यात ज्ञान विज्ञान, भाषोत्पत्ती, सृष्टी रहस्य, साधूलक्षणे याशिवाय देवदेवतादिकांच्या पृथ्वीतलावर अनेक उपयुक्त, तर्कसंगत आणि प्रत्ययकारी कथा आहेत. यात चौदा भुवनांची नावे आहेत. चौसष्ठ कलांची सुसूत्र यादी आहे. हे एक अतिशय मनोरम संवादात्मक पद्म आहे. यात कलियुगाचे केलेले वर्णन अतिशय उचित आहे. महाराज कलियुगाचे असे वर्णन करतात, ‘कलियुग येताच केवळ शंभर निमिषे आयुष्य राहील.’ शंभर निमिष म्हणजे मृत्यूलोकाची शंभर वर्षे असतील. आता हिरव्या पक्षाच्या पोटी मोत्ये उत्पन्न होतात पण कलियुगात कली लागताच मोत्ये नष्ट होऊन समुद्रात उत्पन्न होतील.’ कलियुगाचे वर्णन हे पुराणांतर्गत येणारे एक लोकविलक्षण असे प्रकरण आहे.महाराजांच्या आत्मचरित्रातील एका मनोरम कवितेच्या काही ओळी उद्धृत करून महाराजांच्या परिनिर्वाणाची चर्चा करू या. तेव्हा नारण म्हणे जी शंकरा। तरुण असताही दिसतोसी म्हातारा हे न कळे मज द्विकंठेश्वरा मग इथे नरा काही न कळे । कोण जाणे कैसी गती ही न कळे मजप्रती काय वणरू मायापती सांग आता महाराजांनी योगसामथ्र्याने वृद्धत्व पांघरून घेतले होते. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी 21 जुलै 1945 आषाढ शुद्ध एकादशीदिनी ब्राrामुहूती 8महाराज ब्रrालीन झाले. शहादा तालुक्यातील मनरद येथे त्यांची समाधी आहे.