शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:43 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेंड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी ’ या सदरात प्रा.डॉ. विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव टाकळी येथे 18 मार्च 1915 रोजी शंकर महाराजांचा जन्म झाला. या गावात आदिवासी समाजाचे एकुलते एक घर होते. त्यांच्या वडिलांना नऊ एकराचा एक तुकडा इनाम दाखल मिळाला होता. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपले. शंकर महाराज पोरके झाले पण समाजाचे पोरकेपण दूर केले. एकाकी महाराज मामांकडे वाढले. गावची चाकरी करावी आणि भाकरी मागून खावी असा दिनक्रम होता. वयाच्या 13 वर्षार्पयत हे असे सुरू होते. वयाच्या चौदाव्या वर्षी महाराजांना विरक्तीने घेरले. शिरसगाव येथील रहिवासी दादाभाऊ पाटील यांच्या मळ्यात औदुंबराच्या वृक्षाखाली महाराजांनी निवास केला. पुनश्च गावात न परतण्याचा निश्चय केला. तेथेच एक कुटी बांधली. औदुंबराखाली तपाचरणाला आरंभ झाला. कुणाला काही देणे नाही आणि कुणापाशी काहीही मागणे नाही हा आरंभापासूनचा शिरस्ता होता. वेळेवर कुणी काही आणून दिले तर भले, नाही दिले तरी भले अशी वृत्ती होती. जे मिळेल ते अन्नब्रrा म्हणून सेवन करायचे असा थाट होता. दादाभाऊ पाटील यांचे धाकटे बंधू तुकाराम पाटील त्यांना भोजन आणून देत असत. महाराज अपरिग्रही वृत्तीने राहात. भल्या पहाटे उठावे, गार पाण्याचे स्नान करावे. संत तुकोबा-नामदेव महाराजांचे अभंग म्हणावेत. महाराजांचा आवाज सुरेल होता. ते उत्तम चित्रे काढत असत. बासरी तर विलक्षण एकाग्रतेने वाजवत असत. त्या स्वरांनी उभे रान वेडावून जाई. सर्वत्र नामघोषाचा अमृतध्वनी विहरत राही. महाराजांचे अक्षर वाटोळे, सुंदर आणि चित्रात्मक शैलीचा एक नमुना म्हणता येईल. रानात ते निर्भयपणे एकटेच राहात. आत्मसाक्षात्काराच्या प्रसंगाचे वर्णन करताना महाराजांच्या लेखणीचे आद्र्र होणे स्वाभाविक आहे. ते म्हणतात ‘शके 1857 साली माघ महिन्यात कृष्ण पक्षातील विजया स्मार्त एकादशी रोज मंगळवार ते दिवशी ईश्वरभक्त शंकर हा रात्री ईश्वराचे ध्यान करता बसला होता. अर्धी रात्र झाली होती. मला साक्षात दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला.’ आपल्या जन्म आणि चरित्राबद्दल महाराज असे म्हणत असत, ‘रामावतारात सीतेचा शोध करीत असताना प्रभू रामचंद्रांना वाटेत शबरी भिल्लीणीचा आश्रम लागला. शबरीने रामाला आश्रमात बोलावले. तिने बोरे खाण्यास दिली. जाताना तिला विचारले, ‘तुला कायम हवे ते मागून घे.’ तिने काहीच मागितले नाही करिता तिच्या कुळात जन्म घेऊन रामभक्ती करून तिचे ऋण फेडले. त्या करताच मला या काळात तिच्या कुळात जन्म घ्यावा लागला.’ शंकर महाराजांचे आत्मचरित्र काही केवळ चमत्कारिक कथाप्रसंगांनी भरलेले चरित्र नाहीये. यात ज्ञान विज्ञान, भाषोत्पत्ती, सृष्टी रहस्य, साधूलक्षणे याशिवाय देवदेवतादिकांच्या पृथ्वीतलावर अनेक उपयुक्त, तर्कसंगत आणि प्रत्ययकारी कथा आहेत. यात चौदा भुवनांची नावे आहेत. चौसष्ठ कलांची सुसूत्र यादी आहे. हे एक अतिशय मनोरम संवादात्मक पद्म आहे. यात कलियुगाचे केलेले वर्णन अतिशय उचित आहे. महाराज कलियुगाचे असे वर्णन करतात, ‘कलियुग येताच केवळ शंभर निमिषे आयुष्य राहील.’ शंभर निमिष म्हणजे मृत्यूलोकाची शंभर वर्षे असतील. आता हिरव्या पक्षाच्या पोटी मोत्ये उत्पन्न होतात पण कलियुगात कली लागताच मोत्ये नष्ट होऊन समुद्रात उत्पन्न होतील.’ कलियुगाचे वर्णन हे पुराणांतर्गत येणारे एक लोकविलक्षण असे प्रकरण आहे.महाराजांच्या आत्मचरित्रातील एका मनोरम कवितेच्या काही ओळी उद्धृत करून महाराजांच्या परिनिर्वाणाची चर्चा करू या. तेव्हा नारण म्हणे जी शंकरा। तरुण असताही दिसतोसी म्हातारा हे न कळे मज द्विकंठेश्वरा मग इथे नरा काही न कळे । कोण जाणे कैसी गती ही न कळे मजप्रती काय वणरू मायापती सांग आता महाराजांनी योगसामथ्र्याने वृद्धत्व पांघरून घेतले होते. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी 21 जुलै 1945 आषाढ शुद्ध एकादशीदिनी ब्राrामुहूती 8महाराज ब्रrालीन झाले. शहादा तालुक्यातील मनरद येथे त्यांची समाधी आहे.