शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संत सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सवाची उत्साहात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:24 IST

कीर्तनात भाविक तल्लीन: ग्रंथदिंडीत हजारो भाविकांचा सहभाग

अमळनेर : येथे सुरू असलेल्या संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी अतिशय श्रवणीय कीर्तन सादर केल्याने भाविक तल्लीन झाले.यावेळी प. पू. संत प्रसाद महाराज, विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘कंठी धरला कृष्णमनी अवघा जणी प्रकाश । काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम ।। ’ या अभंगावर अतिशय सुंदर विवेचन सादर करत देगलूरकर महाराज यांनी अमळनेर आणि देगलूरकर यांच्या ऋणानुबंध याबाबत भाविकांना भावनिक साद घातली. तत्पूर्वी सकाळी सखाराम बावन्नीचा पाठ व विष्णुसहस्र नामाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या निघालेल्या ग्रंथदिंडीत सुमारे ५ हजार भाविक डोक्यावर ग्रंथ घेऊन सहभागी झाले. काल्याचा महाप्रसाद स्वत: प्रसाद महाराज यांनी भाविकांना वाटप केला. महाराजांनी स्वत: दही हंडी फोडून काल्यामध्ये दही व लाह्या मिसळून तयार झालेला काला हा प्रसाद म्हणून वाटप केला. सुमारे १५ हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सुमारे ९ दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात राबलेले सर्व कार्यकर्ते, भाविक, आणि भक्ताच्या परिश्रमाचे सार्थक झाल्याचे यावेळी प्रसाद महाराज यांनी सांगितले. या सर्वांचा वाडी संस्थान तर्फे सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त करण्यात आले.