शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पकडले ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:17 IST

चालकाचे पलायन

ठळक मुद्दे डी.पी.अ‍ॅक्टनुसार दुसरा गुन्हा दाखल

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओचे पथक मध्यरात्री रिक्षा, दुचाकीचा वापर करुन साध्या वेशात रस्त्यावर उतरले होते. या पथकाने कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क परिसरात पहाटे तीन वाजता विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. पथकाला पाहून चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून पलायन केले. दरम्यान, याप्रकरणी आरटीओने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३ अन्वये फिर्याद देवून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. याआधी नशिराबाद पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.अवैध वाळू व वाहतुकीबाबत महसूल, पोलीस व आरटीओ असे तिन्ही विभागांनी कारवाईसाठी स्वतंत्रपणे पथके नेमली आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी बुधवारी रात्री वाहन निरीक्षक कमलेश चव्हाण, महेश देशमुख, रणजीत पाटील व दीपक साळुंखे यांचे पथक तयार केले होते. एक अधिकारी दुचाकीवर, दोन अधिकारी रिक्षाने तर एक जण खासगी कारने या भागात गेले होते. हे पथक पहाटे तीन वाजता कानळदा रस्त्यावर विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर अडविले असता चालकाने ट्रॅक्टरवरुन उडी मारुन पोबारा केला.चेसीस क्रमांकावरुन शोधला मालकचालक पळून गेल्यानंतर पथकाने हे ट्रॅक्टर स्वत:चालवून शहर पोलीस स्टेशनला लावले. क्रमांक नसल्याने ट्रॅक्टरचा चेसीस क्रमांक घेऊन गुरुवारी ट्रॅक्टरचा क्रमांक (क्र.एम.एच.१९ सी.व्ही.०५५६) निष्पन्न झाला. त्यानंतर मालक निष्पन्न झाला. राहूल सुरेश सपकाळे (रा.धामणगाव, ता.जळगाव) या व्यक्तीच्या नावावर हे ट्रॅक्टर आहे.आता नव्या कायद्याचा वापरवाळू प्रकरणात दंडात्मक कारवाईसोबतच आरटीओने आता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३ अन्वये (डी.पी.अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला गुन्हा नशिराबादला आरटीओनेच दाखल केला आहे तर शहर पोलीस स्टेशनला हा दुसरा गुन्हा असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. वाळू वाहतूक रोखण्यासाठी आरटीओचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.