शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईसाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

जळगाव : वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी अर्ज प्रक्रियेची मुदत रविवारी होती. ...

जळगाव : वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी अर्ज प्रक्रियेची मुदत रविवारी होती. मात्र, अधिकाधिक पालकांना अर्ज करता यावेत यासाठी ही मुदत ३० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने वाढविली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी अर्ज भरताना पालकांना ओटीपी येत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालकांच्या तक्रारीनंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबली होती. मागील आठवड्यात हा अडसर दूर झाला. प्रक्रिया थांबल्यामुळे बहुतांश पालकांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

३०६५ जागांसाठी आतापर्यंत ५१७९ अर्ज

आरटीई प्रवेशासाठी बुधवारपर्यंत जळगाव जिल्ह्यातून ५ हजार १७९ पालकांनी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज केले आहेत. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे जास्तीत जास्त पालकांना याचा लाभ होणार आहे. मात्र, अधिक अर्ज येऊनसुद्धा जागा रिक्त राहण्‍याची परंपरा दरवर्षी पाहायला मिळते.