शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आरटीईचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:20 IST

आरटीईच्या पाच फेऱ्या राबवून सुध्दा तब्बल ११७० जागा अजूनही रिक्तच

सागर दुबे़शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) खासगी शिक्षण संस्थांमध्ये समग्र शिक्षा अभियान विभागाकडून राबविण्यात आलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेचा यंदाही बोजवारा उडाला आहे. यंदा आरटीईच्या पाच फेऱ्या राबवून सुध्दा तब्बल ११७० जागा अजूनही रिक्तच आहेत.खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश मिळावा यासाठी आरटीईची प्रवेश प्रक्रीया शिक्षण विभागाकडून राबविण्यात आली. यंदा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हजारो पालकांकडून आपल्या पाल्यांसाठी अर्ज दाखल झाली. त्यानंतर जिल्ह्यातील २६१ शाळांमधील नर्सरी व पहिलीच्या ३८१७ जागांवर प्रवेश देण्यासाठी टप्प्या-टप्याने प्रवेश फेरी राबविण्यात आली़ पालकांना पाल्याच्या प्रवेशाचा संदेश देखील विद्यार्थ्यांना पाठविण्यात आला. पाच फेºया पूर्ण झाल्या मात्र, तरी देखील २६१ शाळांमध्ये २६४७ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले तर ११७० जागा रिक्त राहिल्या़ यात मुख्यत: आरटीई म्हटले की अनुदान लवकर मिळत नाही म्हणून खाजगी शाळा चालकांची आरटीई प्रवेशासाठी उदासिनता तर असते पण यंदा पालकांचीही मोठ्या प्रमाणात उदासिनता दिसून आली. त्यामुळे समग्र शिक्षा अभियानाकडून नवीन शैक्षणिक वषार्चे एक सत्र संपूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. जादातर ग्रामीण भागातील पालक आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी या प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला़ परंतू, त्यांना प्रवेशा संदभार्तील येणारा संदेश हा इंग्रजीत असल्यामुळे काही निरक्षर पालकांना ते हा संदेश नेमका कसला याचा संभ्रम निर्माण होता. त्यामुळे ते देखील पाल्याच्या प्रवेशाला मुकतात. आणखी आरटीईच्या जाचक अटींमुळे कागदपत्राअभावी अर्ज रद्द केला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशापासून वंचित रहावे लागतले़ शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात, मात्र त्यासाठी जनजागृती करणे महत्वाचे आहे. आरटीईची जनजागृती करणे तेवढेच महत्व आहे़ पण तसे काही होतांना दिसून येत नाही़ शाळांना दिले जाणारे अनुदान जर वेळेतच दिले तर शाळाही यात उत्फुर्त सहभाग नोदवतील. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही़ यासाठी आता येत्या शैक्षणिक वर्षांत आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभाग काय पाऊल उचलेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे़