शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

संघर्षाची भूमिका घ्यायला सिद्ध व्हावे लागेल

By admin | Updated: June 5, 2017 17:05 IST

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांची जळगावात प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना..

 प्रादेशिक साहित्य परिषदेच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना ते म्हणतात, मराठवाडा साहित्य परिषद म्हणजे निजामशाही कारभार, विदर्भ साहित्य परिषद म्हणजे भोसले संस्थान आणि पुणे साहित्य परिषद म्हणजे पेशवाई तर कोमसाप हे स्वतंत्र राज्य असल्याची संस्थानशाही प्रचलित असल्याने त्या त्या दरबारचे मानपान ओघाने आलेच, यात होतं काय की, साहित्याने माणूस माणसाशी जोडण्याची प्रक्रिया वगळता सर्व प्रकारचे राजकारण यात दिसून येते. त्यात अभ्यासक्रमात आपल्या जवळच्या लेखकांच्या पुस्तकाची वर्णी लावणे, एकमेकांचे हितसंबंध जपणे, दर्जा नसतानाही ओळखी-पाळखीच्या लोकांची पुस्तक छापून आणणे साटेलोटे करून पुरस्कारांची खिरापत वाटणे यासारखे भ्रष्टाचार हे राजकारण्यांना लाजवतील इतके विपुल आहेत. हे तर वाईट आहेच पण याच्याविरोधात कुणीही भूमिका घेत नाही, हे अधिक वाईट आहे. भूमिका न घेणे हे तर सगळ्यात मोठे कट कारस्थान आहे. 

सार्थ अभिमान हवा
आपल्याकडे आदर्श योजना राबवाव्यात, असं सगळ्यांना वाटतं. पण त्यासाठी आपण विरोधात उभं ंराहायला हवं, हे त्यांच्या गावीही नसतं. जे काय करायचं ते त्या त्या विषयाच्या प्रतिनिधींनी पदाधिका:यांनी करावे असा आंधळा आदर्शवाद आपण हिरिरीने मांडतो, पण त्यासाठी संघर्षाची तयारी नसते. आंदोलनात उतरणे, लढायला सिद्ध होणं हे आमचं काम नाही, अशी आमची ठाम समजूत आहे. ही मानसिकता बदलायला हवी असा विचारही आम्हाला करावासा वाटत नाही हे या राज्याच्या भाषा संस्कृतीचे दुर्दैव आहे. इतर राज्यात पाहा तमीळ, तेलुगू, मद्रासी, मल्याळम् या भाषिकांना आपल्या मातृभाषेबद्दल किती पराकोटीचा अभिमान आहे, त्यांच्या लोकसंस्कृती, लोककला यांच्या संवर्धनासाठी तेथील राज्य सरकार आíथक तरतूद करतात.तेथील कलावंत आणि समाज त्यासाठी काम करायला सरकारला भाग पाडते. आमच्याकडे तर राजकीय लोकांची आश्वासनेही आम्हाला भुलविण्यास पुरेशी आहेत, संस्कृती वगैरेही काय सरकारची जबाबदारी आहे होय, असं आम्हाला आणि सरकारला किंवा सरकारला म्हणून आम्हाला वाटतं, पटतं म्हणून मग त्यासाठी आंदोलन वगैरे काही करायचं असतं, हे आम्हाला वाटतचं नाही.
साहित्य हे बहुजन हिताचं असायला हवं, हे सांगण्यात मार्क्‍स, आगरकर, सावरकर, शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, लोहिया, जयप्रकाश नारायण यांनी यासाठी आपली हयात वेचली. समतेचा विचार रुजावा, समाज प्रगल्भ व्हावा म्हणून परिश्रम घेतले आणि आम्ही काय करतो तर दलित बांधवांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा असे बिनदिक्कत जाहीरपणे बोलतो..का बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाजासाठी काहीच केलेलं नाही, संविधान हे त्यांनी फक्त दलितांसाठी मांडलं आहे का? असे सुशिक्षित म्हणवतो ना आपण स्वत:ला मग ही कोणती वृत्ती. तर ही मूठभर ब्राrाण्यवादी विचारसरणी आणि त्यांचे रंजनवादी साहित्य. जे माणसा माणसात भेदभाव करताना दिसतात. नकोय आम्हाला असलं पठडीतलं साहित्य आणि त्याच्या भाषेचा प्रमाणवाद जे आमच्या येणा:या पिढय़ा बर्बाद करतील असं भयावह चित्र आम्हाला दिसत असूनही आम्ही त्याकडे सोईस्कर डोळेझाक करण थांबायला हवे आहे.
याकरिता प्रादेशिक स्तरावर साहित्य, कला संमेलने आयोजित करायला हवी. खान्देशला केशवसूत, बालकवी, बहिणाबाई, दु.आ. तिवारी, भालचंद्र नेमाडे, ना.धों महानोर अशी उज्ज्वल परंपरा आहे इथल्या साहित्यिक, कलावंतांनी एकत्र येऊन घटक संस्थेची स्थापना करावी आणि त्यासाठी महामंडळाची जी काही मदत हवी असेल, ती मंडळ नक्की करेल. आपण म्हणतो साहित्य, सांस्कृतिक संस्था ह्या असाहित्यिक, व्यापारी यांच्या हातात आहेत. पण मग या त्यांच्या हातात दिल्या कुणी, साहित्यिकांच्या उदासीनतेमुळेच ना? तुम्हाला जे खटकतं ते तुम्हीच बदलवू शकता. त्यासाठी संघर्षाची भूमिका घ्यायला सिद्ध व्हावे लागले, तरी उतरा की मैदानात. आपण व्यक्तिगत प्राप्तीसाठी लढतोच ना मग इथं भाषा, संस्कृती व कलेच्या दर्जासाठी लढावं लागत असेल, समतेसाठी आंदोलन करायची तयारी ठेवली तर संवर्धन कोण रोखू शकेल?
-अस्मिता गुरव