शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तिसरी लाट रोखण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याच्या शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आल्या आहेत. तिसरी लाट येईलच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याच्या शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आल्या आहेत. तिसरी लाट येईलच किंवा काय याबाबत मत-मतांतरे असले तरी पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतल्यास भीती न बाळगता सतर्क राहिल्यास ही तिसरी लाट रोखता येऊ शकते, मुलांना बाधित होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा सल्ला शहरातील बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

लहान मुलांच्या बाबतीत आगामी काळात थोडी अधिक सतर्कता बाळगावी लागणार असल्याचे काही डॉक्टर सांगतात. यात अतिकाळजी किंवा भीती न बाळगता योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. यात अगदी साध्या साध्या गोष्टी पाळून आपण आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकणार आहोत. यात आहाराचीही महत्त्वाची भूमिका राहणार असून, यात घरचे ताजे जेवण हवे, यावर डॉक्टरांनी अधिक भर दिला आहे. एकीकडे शासकीय यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असताना पालकांनीही त्यांच्या पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे.

जीएमसीत शंभर बेड

आगामी तिसरी लाट व मुलांमधील अधिक धोका या दृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी शंभर बेडची व्यवस्था राहणार असून, त्यांच्यासाठीच्या व्हेंटिलेटरचेही नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यासह मोहाडी रुग्णालयात स्वतंत्र ५० बेडची व्यवस्था राहणार आहे.

बालकांची ही घ्या काळजी

- बालकांना संतुलित, पौष्टिक आहार द्यावा, नियमित देत असलेले अन्न हेच उत्तम आहे. उगाच व्हिटॅमिनच्या गोळ्या देऊ नये, बाहेरचे अन्न टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे टाळावे, दोन वर्षांवरील मुले मास्क परिधान करू शकतात, त्यामुळे बाहेर कुठे असताना त्यांनी मास्क परिधान करावा. पालकांनी आपण स्वत: बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. मुलांना कसलाही त्रास जाणवल्यास तातडीने त्यांची तपासणी करून योग्य ठिकाणीच उपचार घ्यावेत. फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक्स, पावसात भिजणे याबाबींपासून लहान मुलांना दूर ठेवणे गरेजेचे आहे.

कोट

लहान मुलांना संसर्ग होण्याचा अधिक धोका हा घरातील वरिष्ठांकडूनच आहे. अशा स्थितीत पालकांनी स्वत: सुरक्षित राहिल्यास बालकांना कोविड होण्याचा धोका कमी होईल. कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे पालकांनी टाळलेच पाहिजे, गर्दीचे कार्यक्रम टाळलेच पाहिजे. आहाराच्या बाबतीत नियमितचा संतुलित, पौष्टिक आहार घेतला तरी पुरेसा आहे. त्यात फळे अधिक घेऊ शकतात, अंडी घेऊ शकतात. पालकांची भूमिका यात महत्त्वाची राहणार आहे.

- डॉ. दीपक अटल, बालरोगतज्ज्ञ

कोट

लाट येईलच असे नाही; मात्र, त्यासाठी सतर्क राहणे गरजचे आहे. सर्वात आधी पालकांनी स्वत: सुरक्षित राहावे जेणेकरून मुले सुरक्षित राहतील. कोरोना कमी झालाय म्हणून हलगर्जीपणा केलेला चालणार नाही. मुलांना गर्दीत नेणे टाळायलाच हवे, आता जसे जगतोय, मास्क, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग हे पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय बालकांच्या उपचारांसाठीची एक स्वतंत्र यंत्रणेची मोठी व्यवस्थाही हवी, शासन त्या दृष्टीने प्रयत्न करतेय.

- डॉ. नंदिनी आठवले, बालरोगतज्ज्ञ

घरात कोणीही बाधित आढळल्यास त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मुलांची लक्षणे असो किंवा नसो तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. मुलांना ज्या बाबींचा त्रास होत असेल त्या टाळणे, म्हणजेच पावसात भिजणे असेल, बाहेरचे पदार्थ असतील, कोल्ड्रिंक्स, थंड पाणी या बाबी टाळणे, घरातील ताजा संतुलित आहार त्यांना देणे, त्यांचे लसीकरण करून घेणे, पुढील काळात कोविडसोबतच पोस्ट कोविडच्या विकारांचाही सामना आपल्याला करायचा आहे. त्यादृष्टीने बाळांना लक्षणे आढळल्यास तातडीने योग्य डॉक्टरांकडे दाखवून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरेल.

- बाळासाहेब सुरोसे, बालरोग विभागप्रमुख, जीएमसी.