शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

मुक्ताईनगर : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आंतरजिल्हा प्रवास बंदी करण्यात आली असून खासगी वाहनधारक लूट ...

मुक्ताईनगर : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आंतरजिल्हा प्रवास बंदी करण्यात आली असून खासगी वाहनधारक लूट करत असल्याने किमान तालुक्याच्या आत तरी प्रवासी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.

मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच डेपोमध्ये " जैसे थे"या स्थितीत बस उभ्या आहेत. राज्याच्या लॉकडाऊनच्या नियमावलीमध्ये जिल्हा अंतर्गत बस फेऱ्या बंद आहेत. प्रवास करण्यास मुभा नाही. मुक्ताईनगर आगारातून दररोज एक बस जळगाव येथे व तीच बस जळगाव मुक्ताईनगरला परत अशा दोन फेऱ्या करत आहे, परंतु तालुक्याच्या अंतर्गत मात्र बससेवा बंद आहे.

गेल्या तीन महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आणि विशेषतः खेड्यापाड्यावर रुग्ण आढळून आल्याने मुक्ताईनगर जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या ही मोठ्या संख्येने वाढलेली दिसून आली. या रुग्णांना घरूनच सोईसुविधा काढा, जेवण व गरम पाणी पुरवता यावे तसेच काढा व गरम पाण्याचीदेखील सोय करता यावी म्हणून तालुक्यातील विविध छोट्या-छोट्या खेड्यांमधून रुग्णांचे नातेवाईक मुक्ताईनगरकडे धाव घेत आहेत. मात्र मुक्ताईनगरसाठी बससेवाही सुरू नसल्याने खासगी वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची लूट केली जात आहे. मुक्ताईनगर येथून अंतुर्ली जाण्यासाठी ८० रुपये भाडे, तर कुऱ्हा येथे जाण्यासाठी १०० रुपये भाडे आकारले जात आहे. बसचे भाडे ३० व ३५ रुपये अनुक्रमे असताना तीन पटीने अव्वाच्या सव्वा भाडे आकारून रुग्णांच्या नातेवाईकांची व प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून हीच परिस्थिती असून त्यासाठी नागरिक व प्रवासी खासगी वाहने करतात. हजारो रुपये भाडे देऊन किंवा मोटारसायकलने जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यामुळे किमान तालुका अंतर्गत बससेवा तरी सुरू करण्यात यावी.

मुक्ताईनगर येथून कुऱ्हा ,अंतुर्ली चांगदेव व बोदवड साठी बससेवा सुरू करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. किमान एक बस जाण्यासाठी व सायंकाळी परतण्यासाठी दुसरी बस अशा दोन बस तरी असाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तालुक्यातील खेडेगावातून बस सेवा सुरू असल्यास तेच प्रवासी जळगावसाठीसुद्धा पुढच्या बसला जाऊन प्रवासी मिळू शकतात. हा विचार एसटी आगाराने करावा व तत्काळ बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.