शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

जळगावातील राष्टÑीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ‘नही’चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:21 PM

मोबदला अ‍ॅवार्डविरोधात ‘नही’ कोर्टात

ठळक मुद्दे१० हेक्टरसाठी ८० कोटीच्या मोबदल्याला विरोधतरसोद -चिखली दरम्यान कामालाही विलंबनिकाल लागल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया होणार पूर्ण

जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचे काम त्वरित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात असताना शहरातून जाणारा महामार्ग शहराबाहेर जाण्यासाठी करावयाच्या वळण रस्त्याची सुमारे १० हेक्टर जागाच अद्याप प्रशासनाच्या ताब्यात आलेली नाही.         या जागेच्या भूसंपादनासाठी केलेल्या अ‍ॅवार्डविरोधात ‘नही’ नेच (राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण) उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने हे भूसंपादन रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आणखी एक-दोन महिने ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता असून त्यानंतरच या वळण रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊ शकेल.तरसोद -चिखली दरम्यानही विलंबराष्टÑीय महामार्ग क्र.६च्या धुळे ते अमरावती दरम्यान  तीन टप्प्यात  करावयाच्या चौपदरीकरणासाठी २०१२ पासून प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात सातत्याने वेगवेगळे अडथळे येत गेल्याने हे काम अर्धवटच आहे. महाराष्टÑातील अमरावती ते धुळे या दरम्यानच्या महामार्गापैकी जळगाव जिल्ह्यात चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे करून निविदा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मिळालेल्या मक्तेदाराने कामाला वेगाने सुरूवात केली आहे. मात्र तरसोद ते फागणे या टप्प्याच्या कामाला अद्यापही सुरूवात झालेली नाही. मक्तेदाराकडून अद्याप कॅम्प उभारणीचेच काम सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मक्तेदाराकडून आढावाही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मिळालेल्या मक्तेदाराने तातडीने कामाला प्रारंभ केला आहे. मात्र या मक्तेदाराकडेच असलेल्या जळगाव शहराबाहेरील वळण रस्त्याच्या कामात भूसंपादनच झालेले नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. जळगाव शहरातून जाणारा राष्टÑीय महामार्ग शहराबाहेरून वळविण्यासाठी तरसोदजवळील टीव्ही टॉवर पासून ते आव्हाणे शिवारातून थेट बांभोरीपर्यंत वळण रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कमिटीने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करून अ‍ॅवार्डही घोषीत केले. या वळण रस्त्यासाठी सुमारे १० हेक्टर जमीन लागणार असून त्याच्या मोबदल्यापोटी या कमिटीने सुमारे ८० कोटीचे अ‍ॅवार्ड केले आहे. मात्र ‘नही’ने याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने ही जमीन अद्यापही प्रशासनाच्या ताब्यातच आलेली नाही. त्यामुळे मक्तेदाराला या वळण रस्त्याचे काम सुरु करता आलेले नाही. शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे हा महामार्ग शहराबाहेरून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्या वळण रस्त्याच्या जागेच्या मोबदल्याची रक्कम जास्त असल्याचा आक्षेप घेत ’नही’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आधीच समांतर रस्ते नसल्याने अपघात होत असताना हा मार्ग शहराबाहेरून जाण्याच्या कामातही ’नही’मुळेही अडथळा निर्माण झाला आहे. निकाल लागल्यानंतरच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन वळण रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊ शकेल, दरम्यान, याबाबत ‘नही’च्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.