शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

कोट्यवधी खर्च करूनही रस्ता रात्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि ...

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि रोझोदा गावातील काम अपूर्ण असून रोझोद्यात कामाची सुरुवात झाली आहे. हा रस्ता मोठा असून यावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. बोरघाटात मात्र हा रस्ता लहान तथा वळणदार घाट असल्याने परप्रांतीय मोठमोठे ट्रक पाल-रावेर मार्गे वळवण्यात येतात. हा महामार्ग मध्य प्रदेश व राजस्थानला जोडला गेला असून यात झिरन्या, खरगोन, खलघाट, सेधंवा, इंदूर, व रतलाम अशा शहरांना जोडला गेला आहे. खरगोन ते खलघाट हा महामार्ग दुहेरीकरणाचे काम मध्य प्रदेश शासनाने सुरू केले आहे. खलघाट ते चित्तोडगड हा सलग महामार्ग दुहेरीकरणाचे काम काही वर्षापूर्वीच झाले आहे.

रस्तालुटीचे प्रकार

या महामार्गाचे काम आमोदा ते पाल असे ९८ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपासून सुरू राहिले. दरम्यान काही दिवसा आडरात्री बोरघाटात वळणावर झाड आडवे टाकून रस्तालूट करण्यात येते यात पधंरा ते वीस जणांची टोळी अचानक हल्ला करून वाहनचालकाच्या जवळील सर्व रक्कम मोबाइल हिसकावून घेतात, मानेवर चाकूचा धाक दाखवून तथा बेदम मारहाण करून रस्तालूट होते. काही जण तर मार खाण्याअगोदरच जवळील सर्व रक्कम रस्तालूट करणाऱ्या टोळीच्या हवाली करतात.

एकाही आरोपीचा तपास नाही

रस्तालुटींबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी आतापर्यंत एकाही सशंयित आरोपीला ताब्यात घेतले नाही. घनदाट जंगल व रात्रीचा फायदा घेत रस्तालूट करणारे रात्री पसार होतात.

उपाय नव्हे हा तर अपाय!

रात्री पोलीस पेट्रोलिंग करतात, पण हाती काही काही नसते. रस्तालूट थाबंवाबची कशी. असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. ही रस्ता लूट थांबविण्यासाठी सावदा पोलिसांनी एक विचित्र शक्कल केली आहे. नाकाबंदी केली तर वाहने न जाता रस्तालूटच होणार नाही, असा विचार करीत रात्री नाकाबंदीच केली आहे.

अशे आदेशच सावदा पोलिसानीं वन्यजीव नाक्यावर असलेल्या वनमजुरांना दिले. याबाबत नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी दिसून येत आहे.

घाटात बंदूकधारी पोलीस नेमण्याची मागणी

वन्यजीव वनक्षेत्रपाल पालचे अधिकारी यांना रस्ता बंदबाबत विचारणा केली, असता घाट परिसरात जेथे रस्तालूट होते त्या ठिकाणी बदूंकधारी पोलीस कर्मचारी पाचारण केले तर रस्तालूट होणार नाही. पण घाटात रात्री थांबेल कोण? असा प्रश्न आहे. तरी पोलीस विभागाकडे बंदूकधारी कर्मचारी घाटात रात्री नेमावे, अशी मागणी होत आहे.

रात्री नऊ वाजेला नाक्यावर पोलिसाच्या कृपेने असा मार्ग बंद केला जातो.