शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्च करूनही रस्ता रात्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि ...

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि रोझोदा गावातील काम अपूर्ण असून रोझोद्यात कामाची सुरुवात झाली आहे. हा रस्ता मोठा असून यावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. बोरघाटात मात्र हा रस्ता लहान तथा वळणदार घाट असल्याने परप्रांतीय मोठमोठे ट्रक पाल-रावेर मार्गे वळवण्यात येतात. हा महामार्ग मध्य प्रदेश व राजस्थानला जोडला गेला असून यात झिरन्या, खरगोन, खलघाट, सेधंवा, इंदूर, व रतलाम अशा शहरांना जोडला गेला आहे. खरगोन ते खलघाट हा महामार्ग दुहेरीकरणाचे काम मध्य प्रदेश शासनाने सुरू केले आहे. खलघाट ते चित्तोडगड हा सलग महामार्ग दुहेरीकरणाचे काम काही वर्षापूर्वीच झाले आहे.

रस्तालुटीचे प्रकार

या महामार्गाचे काम आमोदा ते पाल असे ९८ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपासून सुरू राहिले. दरम्यान काही दिवसा आडरात्री बोरघाटात वळणावर झाड आडवे टाकून रस्तालूट करण्यात येते यात पधंरा ते वीस जणांची टोळी अचानक हल्ला करून वाहनचालकाच्या जवळील सर्व रक्कम मोबाइल हिसकावून घेतात, मानेवर चाकूचा धाक दाखवून तथा बेदम मारहाण करून रस्तालूट होते. काही जण तर मार खाण्याअगोदरच जवळील सर्व रक्कम रस्तालूट करणाऱ्या टोळीच्या हवाली करतात.

एकाही आरोपीचा तपास नाही

रस्तालुटींबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी आतापर्यंत एकाही सशंयित आरोपीला ताब्यात घेतले नाही. घनदाट जंगल व रात्रीचा फायदा घेत रस्तालूट करणारे रात्री पसार होतात.

उपाय नव्हे हा तर अपाय!

रात्री पोलीस पेट्रोलिंग करतात, पण हाती काही काही नसते. रस्तालूट थाबंवाबची कशी. असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. ही रस्ता लूट थांबविण्यासाठी सावदा पोलिसांनी एक विचित्र शक्कल केली आहे. नाकाबंदी केली तर वाहने न जाता रस्तालूटच होणार नाही, असा विचार करीत रात्री नाकाबंदीच केली आहे.

अशे आदेशच सावदा पोलिसानीं वन्यजीव नाक्यावर असलेल्या वनमजुरांना दिले. याबाबत नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी दिसून येत आहे.

घाटात बंदूकधारी पोलीस नेमण्याची मागणी

वन्यजीव वनक्षेत्रपाल पालचे अधिकारी यांना रस्ता बंदबाबत विचारणा केली, असता घाट परिसरात जेथे रस्तालूट होते त्या ठिकाणी बदूंकधारी पोलीस कर्मचारी पाचारण केले तर रस्तालूट होणार नाही. पण घाटात रात्री थांबेल कोण? असा प्रश्न आहे. तरी पोलीस विभागाकडे बंदूकधारी कर्मचारी घाटात रात्री नेमावे, अशी मागणी होत आहे.

रात्री नऊ वाजेला नाक्यावर पोलिसाच्या कृपेने असा मार्ग बंद केला जातो.