शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

कोट्यवधी खर्च करूनही रस्ता रात्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि ...

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि रोझोदा गावातील काम अपूर्ण असून रोझोद्यात कामाची सुरुवात झाली आहे. हा रस्ता मोठा असून यावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. बोरघाटात मात्र हा रस्ता लहान तथा वळणदार घाट असल्याने परप्रांतीय मोठमोठे ट्रक पाल-रावेर मार्गे वळवण्यात येतात. हा महामार्ग मध्य प्रदेश व राजस्थानला जोडला गेला असून यात झिरन्या, खरगोन, खलघाट, सेधंवा, इंदूर, व रतलाम अशा शहरांना जोडला गेला आहे. खरगोन ते खलघाट हा महामार्ग दुहेरीकरणाचे काम मध्य प्रदेश शासनाने सुरू केले आहे. खलघाट ते चित्तोडगड हा सलग महामार्ग दुहेरीकरणाचे काम काही वर्षापूर्वीच झाले आहे.

रस्तालुटीचे प्रकार

या महामार्गाचे काम आमोदा ते पाल असे ९८ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपासून सुरू राहिले. दरम्यान काही दिवसा आडरात्री बोरघाटात वळणावर झाड आडवे टाकून रस्तालूट करण्यात येते यात पधंरा ते वीस जणांची टोळी अचानक हल्ला करून वाहनचालकाच्या जवळील सर्व रक्कम मोबाइल हिसकावून घेतात, मानेवर चाकूचा धाक दाखवून तथा बेदम मारहाण करून रस्तालूट होते. काही जण तर मार खाण्याअगोदरच जवळील सर्व रक्कम रस्तालूट करणाऱ्या टोळीच्या हवाली करतात.

एकाही आरोपीचा तपास नाही

रस्तालुटींबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी आतापर्यंत एकाही सशंयित आरोपीला ताब्यात घेतले नाही. घनदाट जंगल व रात्रीचा फायदा घेत रस्तालूट करणारे रात्री पसार होतात.

उपाय नव्हे हा तर अपाय!

रात्री पोलीस पेट्रोलिंग करतात, पण हाती काही काही नसते. रस्तालूट थाबंवाबची कशी. असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. ही रस्ता लूट थांबविण्यासाठी सावदा पोलिसांनी एक विचित्र शक्कल केली आहे. नाकाबंदी केली तर वाहने न जाता रस्तालूटच होणार नाही, असा विचार करीत रात्री नाकाबंदीच केली आहे.

अशे आदेशच सावदा पोलिसानीं वन्यजीव नाक्यावर असलेल्या वनमजुरांना दिले. याबाबत नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी दिसून येत आहे.

घाटात बंदूकधारी पोलीस नेमण्याची मागणी

वन्यजीव वनक्षेत्रपाल पालचे अधिकारी यांना रस्ता बंदबाबत विचारणा केली, असता घाट परिसरात जेथे रस्तालूट होते त्या ठिकाणी बदूंकधारी पोलीस कर्मचारी पाचारण केले तर रस्तालूट होणार नाही. पण घाटात रात्री थांबेल कोण? असा प्रश्न आहे. तरी पोलीस विभागाकडे बंदूकधारी कर्मचारी घाटात रात्री नेमावे, अशी मागणी होत आहे.

रात्री नऊ वाजेला नाक्यावर पोलिसाच्या कृपेने असा मार्ग बंद केला जातो.