शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कोट्यवधी खर्च करूनही रस्ता रात्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि ...

पाल, ता. रावेर : येथील भुसावळ- चित्तोडगड महामार्गाचे काम ९० टक्कॆ पूर्ण झाले आहे. पाल आणि रोझोदा गावातील काम अपूर्ण असून रोझोद्यात कामाची सुरुवात झाली आहे. हा रस्ता मोठा असून यावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. बोरघाटात मात्र हा रस्ता लहान तथा वळणदार घाट असल्याने परप्रांतीय मोठमोठे ट्रक पाल-रावेर मार्गे वळवण्यात येतात. हा महामार्ग मध्य प्रदेश व राजस्थानला जोडला गेला असून यात झिरन्या, खरगोन, खलघाट, सेधंवा, इंदूर, व रतलाम अशा शहरांना जोडला गेला आहे. खरगोन ते खलघाट हा महामार्ग दुहेरीकरणाचे काम मध्य प्रदेश शासनाने सुरू केले आहे. खलघाट ते चित्तोडगड हा सलग महामार्ग दुहेरीकरणाचे काम काही वर्षापूर्वीच झाले आहे.

रस्तालुटीचे प्रकार

या महामार्गाचे काम आमोदा ते पाल असे ९८ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपासून सुरू राहिले. दरम्यान काही दिवसा आडरात्री बोरघाटात वळणावर झाड आडवे टाकून रस्तालूट करण्यात येते यात पधंरा ते वीस जणांची टोळी अचानक हल्ला करून वाहनचालकाच्या जवळील सर्व रक्कम मोबाइल हिसकावून घेतात, मानेवर चाकूचा धाक दाखवून तथा बेदम मारहाण करून रस्तालूट होते. काही जण तर मार खाण्याअगोदरच जवळील सर्व रक्कम रस्तालूट करणाऱ्या टोळीच्या हवाली करतात.

एकाही आरोपीचा तपास नाही

रस्तालुटींबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी आतापर्यंत एकाही सशंयित आरोपीला ताब्यात घेतले नाही. घनदाट जंगल व रात्रीचा फायदा घेत रस्तालूट करणारे रात्री पसार होतात.

उपाय नव्हे हा तर अपाय!

रात्री पोलीस पेट्रोलिंग करतात, पण हाती काही काही नसते. रस्तालूट थाबंवाबची कशी. असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. ही रस्ता लूट थांबविण्यासाठी सावदा पोलिसांनी एक विचित्र शक्कल केली आहे. नाकाबंदी केली तर वाहने न जाता रस्तालूटच होणार नाही, असा विचार करीत रात्री नाकाबंदीच केली आहे.

अशे आदेशच सावदा पोलिसानीं वन्यजीव नाक्यावर असलेल्या वनमजुरांना दिले. याबाबत नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी दिसून येत आहे.

घाटात बंदूकधारी पोलीस नेमण्याची मागणी

वन्यजीव वनक्षेत्रपाल पालचे अधिकारी यांना रस्ता बंदबाबत विचारणा केली, असता घाट परिसरात जेथे रस्तालूट होते त्या ठिकाणी बदूंकधारी पोलीस कर्मचारी पाचारण केले तर रस्तालूट होणार नाही. पण घाटात रात्री थांबेल कोण? असा प्रश्न आहे. तरी पोलीस विभागाकडे बंदूकधारी कर्मचारी घाटात रात्री नेमावे, अशी मागणी होत आहे.

रात्री नऊ वाजेला नाक्यावर पोलिसाच्या कृपेने असा मार्ग बंद केला जातो.