शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

पाणी टंचाईमुळे धरणगावी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:29 IST

२० दिवसांपाूसन पाणीपुरवठा ठप्प

धरणगाव : महिना लोटत आला तरी दमदार पाऊस न पडल्याने शहरासह तालुक्यात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शहराला पाणी पुररवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहातील पाणी संपूर्णत: संपल्याने गेल्या २० ते २५ दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. अशात पाण्यासाठी आक्रोश करणाºया पन्नास हजार लोकवस्तीच्या शहरवासीयांना फक्त दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने पालिकेवर नागरिकांनी रोष व्यक्त करुन अचानक रास्तारको केला.तिघे आरक्षित आवर्तन संपले....धरणगाव शहरासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने १८० दशलक्ष घनमिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते.पैकी एक आवर्तन डिसेंबर मध्ये हतनुर धरणातून तर दोन आवर्तन गुळ प्रकल्पातून फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात घेतले होते. हल्ली गुळ प्रकल्पातही आवर्तन देण्याएवढे पाणी नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.आक्रोश आंदोलन...गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी येत नसल्याने शहरवासी पाण्यासाठी आक्रोश करीरीत आहे. २ रोजी सकाळी व्दारकादास विहीरीजवळ नागरीकांनी अचानक रास्तारोको आंदोलन करुन तिव्र संताप व्यक्त केला.जर या दोन दिवसात शहरवासीयांना पाणी मिळाले नाही तर नगरपापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना बसणे अवघड होईल अशी चिन्हे दिसत आहे.व्दारकादास विहीर ठरतेय संजीवनी...शहरातील गांधी उद्यान लगत असलेल्या व्दारकादास (भांगकुवा) विहीरीने नेहमी दुष्काळी स्थितीत तारले आहे. आताही ही विहीर रात्रंदिवस शहराला पाणी पुरवठा करीत आहे. मात्र गावातील काही खाजगी टँकरधारक मनमानी भावाने पाणी विक्री करीत आहेत.यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.हतनुरच्या पाण्याची प्रतिक्षा....गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे (धरणागव तालुक्यात नाही) हतनुर धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. ते पाणी धावडा डोहापर्यत केव्हा पोहचेल व केव्हा शहराला पाणी मिळेल अशी प्रतिक्षा न.पा.प्रशासनासह शहरवासीयांना आहे.शहराचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु होता.मात्र दुर्दैवाने धावडा डोहातील पाणी संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. धरणांमध्येही पाणी नसल्याने आवर्तन मिळणे शक्य नाही.हतनुरचे पाणी लवकरच तापी पात्रात पोहचेल, याची प्रतिक्षा आहे. पाणी पोहचल्याबरोबर पाणी पुरवठा केला जाईल. हल्ली शहराला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे.- अंजली भानुदास विसावे,उपनगराध्यक्षा धरणगाव