शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

पाणी टंचाईमुळे धरणगावी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:29 IST

२० दिवसांपाूसन पाणीपुरवठा ठप्प

धरणगाव : महिना लोटत आला तरी दमदार पाऊस न पडल्याने शहरासह तालुक्यात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शहराला पाणी पुररवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहातील पाणी संपूर्णत: संपल्याने गेल्या २० ते २५ दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. अशात पाण्यासाठी आक्रोश करणाºया पन्नास हजार लोकवस्तीच्या शहरवासीयांना फक्त दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने पालिकेवर नागरिकांनी रोष व्यक्त करुन अचानक रास्तारको केला.तिघे आरक्षित आवर्तन संपले....धरणगाव शहरासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने १८० दशलक्ष घनमिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते.पैकी एक आवर्तन डिसेंबर मध्ये हतनुर धरणातून तर दोन आवर्तन गुळ प्रकल्पातून फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात घेतले होते. हल्ली गुळ प्रकल्पातही आवर्तन देण्याएवढे पाणी नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.आक्रोश आंदोलन...गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी येत नसल्याने शहरवासी पाण्यासाठी आक्रोश करीरीत आहे. २ रोजी सकाळी व्दारकादास विहीरीजवळ नागरीकांनी अचानक रास्तारोको आंदोलन करुन तिव्र संताप व्यक्त केला.जर या दोन दिवसात शहरवासीयांना पाणी मिळाले नाही तर नगरपापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना बसणे अवघड होईल अशी चिन्हे दिसत आहे.व्दारकादास विहीर ठरतेय संजीवनी...शहरातील गांधी उद्यान लगत असलेल्या व्दारकादास (भांगकुवा) विहीरीने नेहमी दुष्काळी स्थितीत तारले आहे. आताही ही विहीर रात्रंदिवस शहराला पाणी पुरवठा करीत आहे. मात्र गावातील काही खाजगी टँकरधारक मनमानी भावाने पाणी विक्री करीत आहेत.यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.हतनुरच्या पाण्याची प्रतिक्षा....गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे (धरणागव तालुक्यात नाही) हतनुर धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. ते पाणी धावडा डोहापर्यत केव्हा पोहचेल व केव्हा शहराला पाणी मिळेल अशी प्रतिक्षा न.पा.प्रशासनासह शहरवासीयांना आहे.शहराचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु होता.मात्र दुर्दैवाने धावडा डोहातील पाणी संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. धरणांमध्येही पाणी नसल्याने आवर्तन मिळणे शक्य नाही.हतनुरचे पाणी लवकरच तापी पात्रात पोहचेल, याची प्रतिक्षा आहे. पाणी पोहचल्याबरोबर पाणी पुरवठा केला जाईल. हल्ली शहराला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे.- अंजली भानुदास विसावे,उपनगराध्यक्षा धरणगाव