शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्यूकरमायकोसिसचा ३० ते ६० वयोगटासाठी धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११ रुग्णांना म्यूकरमायकोसिसचे निदान झाल्यानंतर यांच्या निरीक्षणात हा आजार कोणत्याही वयोगटातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११ रुग्णांना म्यूकरमायकोसिसचे निदान झाल्यानंतर यांच्या निरीक्षणात हा आजार कोणत्याही वयोगटातील रुग्णांना होऊ शकतो. या ११ रुग्णांमध्ये ३० ते ६० वयोगटाचे रुग्ण असल्याचे निरीक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदविले आहे. दरम्यान, स्वच्छतेचा अभाव हा एक मुद्दा महत्त्वाचा असल्याने अतिदक्षता विभागातील सर्व साधनांची नियमीत स्वच्छता व्हावी, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यासह राज्यभरात म्यूकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जळगाव जिल्ह्यातही याचे रुग्ण अगदी झपाट्याने वाढत आहेत. त्यातच खासगी यंत्रणेत या आजाराचे उपचार हे महागडे असल्याने याचे उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या आजाराचा आढावा घेऊन स्वच्छतेबाबत सूचना दिल्या आहेत.

असे आहे निरीक्षण

ज्यांना म्युकरमायकोसिस झाला, त्यातील ८ रुग्णांना मधुमेह आहे. यात ७ पुरूष व ६ महिलांचा समावेश आहे. ३० ते ६० वयोगटातील हे रुग्ण आहे. जीएमसीत ३ मृत्यू, मात्र, ते कोविडमुळेच झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे

अशी असेल कार्यपद्धती

टास्कफोर्समधील औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉक्टर हे रुग्ण संशयित असल्याची घोषणा करतील, त्यानंतर त्याच्या लक्षणानुसार नेत्ररोगतज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ हे संबधित रुग्णांची तपासणी करतील. त्यानंतर सुक्ष्मजीव शास्त्र विभागाद्वारे तपासण्या केल्या जातील, यात बुरशीची वाढ किती याची एक तपासणी होईल. त्यानंतर औषधोपचार सुरू करण्यात येतील, रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज पडल्यास ती जीएमसीतच होईल, दरम्यान, हे उपचार जनआरोग्य योजनेतून होणार आहेत.

तज्ज्ञ काय सांगतात

औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.भाऊराव नाखले यांनी सांगितले की, ही बुरशी जमिनीवर व दमट वातावरणात वाढते, हवेतून ती विविध वस्तूंवर बसते, कोविडमध्ये रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते, त्यातच मधुमेह, विविध प्रकारच्या औषधी प्रतिकारक्षमता अधिक प्रभावीत करीत असतात, अशा वेळी या बुरशीशी संपर्क आल्यास हा आजार बळावण्याचा धोका असतो. यात लवकर निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. यात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत मृत्यूदर आहे.