शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

मेटॅडोअरचा धक्क्याने रिक्षा पुलावरुन कोसळली

By admin | Updated: January 6, 2017 01:21 IST

महामार्गावरील पिंप्राळा उड्डाणपुलावरील घटना : दैव बलवत्तर म्हणून बचावले रिक्षा चालक व सहकारी

जळगाव : भरधाव वेगाने मागून येणा:या मॅटेडोअरचा कट लागल्याने मालवाहू रिक्षा थेट उड्डाणपुलावरुन शंभर ते दीडशे फुट खाली कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता पिंप्राळा पुलाजवळ घडली.या अपघातात सात ते आठ पलटी घेतल्याने रिक्षाचे दोन तुकडे झाले. दैव बलवत्तर म्हणून रिक्षा चालक व त्याचा सहकारी बालंबाल बचावले. मॅटेडोअर चालकाने रस्त्याने येताना दोन ते तीन वाहनाना कट मारला होता, त्यामुळे तो या अपघाताच्या वेळी तेथे न थांबता पसार झाला.गणेश कॉलनीतील पालीवाल टेन्ट हाऊसची रिक्षा (क्र.एम.एच.19 एस.0884) घेवून चालक कैलास दामू सावळे (रा.हुडको, पिंप्राळा)व त्याचा सहकारी अनिल शिरसाठ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर असलेल्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमातील टेन्ट हाऊसचे साहित्य घ्यायला गेले होते. तेथून परत गणेश कॉलनीत येत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास महामार्गावर पिंप्राळा पुलाजवळ मागून भरधाव वेगाने येणा:या मेटॅडोअरचा कट लागला, त्यात रिक्षा थेट पलटी घेत खाली कोसळली. पलटी घेत असताना कैलास व अनिल या दोघांनी जीव मुठीत घेवून स्वत:ला सावरले. झाडाझुडपांमध्ये अंगावर दगड व काटे लागले.  रिक्षाचा पुढील भाग व ट्रॉली तुटून वेगळी झाली. त्यात तिचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.बालंबाल बचावले दोघंया अपघातात चालक कैलास याच्या पायाला मुका मार लागला आहे तर अनिलला किरकोळ दुखापत झाली.दोन्ही बालंबाल बचावले आहे. तसेच खालच्या रस्त्यावर सुदैवाने त्यावेळी एकही वाहन अथवा व्यक्ती रस्त्यावरुन वापरत नव्हता, अन्यथा त्यांच्या अंगावरच रिक्षा आली असती व मोठी घटना घडली असती. अपघाताची माहिती मिळताच रिक्षा व टेन्ट हाऊचे मालक नंदू पालीवाल, माजी नगरसेवक मंगलसिंग पाटील, केतन पाटील यांनी घटनास्थळ गाठून चालकाला दवाखान्यात हलविले. वाहतुकीचा खोळंबा महामार्गावर व पिंप्राळा रस्त्याला लागून महामार्गाला जोडणा:या रस्त्यावर वाहतुकीची खोळंबा झाला होता. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे बीट मार्शल रवी तायडे व मनोज कोळी यांनी घटनास्थळ गाठून वाहतुक सुरळीत केली व अपघातग्रस्त रिक्षा इतरत्र हलविली. दरम्यान, महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. बुधवारी वराड गावाजवळ भरधाव वेगाने जाणा:या ट्रकने विद्यार्थिनीचा बळी घेतला होता. त्यानंतर दुस:याच दिवशी हा अपघात झाला.