शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात आठ वाळू गटांच्या लिलावातून साडे सात कोटींवर महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांपैकी केवळ आठ गटांचे लिलाव झाले असून त्यातून सात कोटी ५८ लाख ...

जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांपैकी केवळ आठ गटांचे लिलाव झाले असून त्यातून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची हातची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा काढण्यात आली आहे. २५ मार्च रोजी आलेल्या निविदा उघडण्यात येणार आहे.

दरम्यान, वाळू गटांचे लिलाव झाले नाही तरी जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. यातून झालेल्या अपघातात २०२० या वर्षात ६८ जणांना जीव गमवावा लागला आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या वाळूला मोठी मागणी असल्याने जिल्ह्यातून बाराही महिने वाळूचा बेसुमार उपसा सुरू असतो. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळत नसल्याने वाळू गटांचे लिलाव रखडले होते. अखेर पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला. यात बांभोरी, घाडवेल (ता. चोपडा), आव्हाणी (ता. धरणगाव), नारणे, वैजनाथ, टाकरखेडा , उत्राण १, उत्राण २ या आठ वाळू गटांचे लिलाव होऊन त्यातून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळाला. मात्र जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली. आलेल्या निविदा २५ मार्च रोजी उघडल्या जाणार असून आता २५ टक्के हातची किंमत कमी करूनही किती गटांना प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे.

वाळूच्या लिलावात ज्या गटांचा लिलाव झाला त्यातून उचल करताना लिलाव न झालेल्या गटातूनही वाळू उचलली जाते. या नेहमीचा अनुभव असल्याने शक्यतो इतर गटांना प्रतिसाद मिळत नाही. याच कारणामुळेही यंदा उर्वरित वाळू गटांचे लिलाव रखडत असल्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात वाळू वाहनांमुळे ६८ जण ठार

जिल्ह्यात मागील वर्षभरात ७५२ रस्ता अपघात झाले त्यात ४७१ जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी १५ टक्के अपघात हे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर, डंपर आदींमुळे झालेले आहेत. प्रत्येक अपघात जीव गेलेला आहे. वर्षभरात वाहनांमुळे अंदाजे ६८ ते ७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत देखील वाळू वाहनांमुळे अपघाताच्या सहा ते सात घटना घडलेल्या आहेत. याच महिन्यात इच्छा देवी चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत कंपनीत जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय अजिंठा चौक, रेमंड चौकातही वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघात होऊन निष्पाप तरुणांचा जीव गेलेला आहे. अपघातात मृत झालेल्या तरुणांची संख्या ७० टक्के आहे. त्यात दुचाकीस्वारांची टक्केवारी ३६.५ इतकी आहे.

—————————-

जिल्ह्यातील आठ वाळू गटांचे लिलाव झाले असून उर्वरित वाळू गटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा मागविल्या आहे. जिल्ह्याला गौण खनिज महसुलाचे १०५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट असून ते साध्य होईल.

- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.