शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जळगाव जिल्ह्यात आठ वाळू गटांच्या लिलावातून साडे सात कोटींवर महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांपैकी केवळ आठ गटांचे लिलाव झाले असून त्यातून सात कोटी ५८ लाख ...

जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांपैकी केवळ आठ गटांचे लिलाव झाले असून त्यातून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची हातची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा काढण्यात आली आहे. २५ मार्च रोजी आलेल्या निविदा उघडण्यात येणार आहे.

दरम्यान, वाळू गटांचे लिलाव झाले नाही तरी जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. यातून झालेल्या अपघातात २०२० या वर्षात ६८ जणांना जीव गमवावा लागला आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या वाळूला मोठी मागणी असल्याने जिल्ह्यातून बाराही महिने वाळूचा बेसुमार उपसा सुरू असतो. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळत नसल्याने वाळू गटांचे लिलाव रखडले होते. अखेर पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला. यात बांभोरी, घाडवेल (ता. चोपडा), आव्हाणी (ता. धरणगाव), नारणे, वैजनाथ, टाकरखेडा , उत्राण १, उत्राण २ या आठ वाळू गटांचे लिलाव होऊन त्यातून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळाला. मात्र जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली. आलेल्या निविदा २५ मार्च रोजी उघडल्या जाणार असून आता २५ टक्के हातची किंमत कमी करूनही किती गटांना प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे.

वाळूच्या लिलावात ज्या गटांचा लिलाव झाला त्यातून उचल करताना लिलाव न झालेल्या गटातूनही वाळू उचलली जाते. या नेहमीचा अनुभव असल्याने शक्यतो इतर गटांना प्रतिसाद मिळत नाही. याच कारणामुळेही यंदा उर्वरित वाळू गटांचे लिलाव रखडत असल्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात वाळू वाहनांमुळे ६८ जण ठार

जिल्ह्यात मागील वर्षभरात ७५२ रस्ता अपघात झाले त्यात ४७१ जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी १५ टक्के अपघात हे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर, डंपर आदींमुळे झालेले आहेत. प्रत्येक अपघात जीव गेलेला आहे. वर्षभरात वाहनांमुळे अंदाजे ६८ ते ७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत देखील वाळू वाहनांमुळे अपघाताच्या सहा ते सात घटना घडलेल्या आहेत. याच महिन्यात इच्छा देवी चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत कंपनीत जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय अजिंठा चौक, रेमंड चौकातही वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघात होऊन निष्पाप तरुणांचा जीव गेलेला आहे. अपघातात मृत झालेल्या तरुणांची संख्या ७० टक्के आहे. त्यात दुचाकीस्वारांची टक्केवारी ३६.५ इतकी आहे.

—————————-

जिल्ह्यातील आठ वाळू गटांचे लिलाव झाले असून उर्वरित वाळू गटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा मागविल्या आहे. जिल्ह्याला गौण खनिज महसुलाचे १०५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट असून ते साध्य होईल.

- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.