शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

निकाल तर लागला, पण गुणपत्रक महाविद्यालयांना पोहोचली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निकाल जलद गतीने लावली गेली, पण महाविद्यालयापर्यंत निकालांच्या प्रती अद्यापपर्यंत पोहोचलेल्या ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून निकाल जलद गतीने लावली गेली, पण महाविद्यालयापर्यंत निकालांच्या प्रती अद्यापपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परिणामी, तृतीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे तत्काळ निकालांच्या प्रती महाविद्यालयांना पाठविण्यात याव्या, अशी मागणी एनएसयूआयच्या वतीने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक किशोर पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. नुकतेच पदवीच्या तृतीय वर्षाचे निकालही जाहीर झाले आहे. मात्र, निकालपत्र अद्याप महाविद्यालयापर्यंत पोहोचलेले नाही. त्यातच निकालपत्र मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेटही मिळू शकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्यापीठाने महाविद्यालयांना निकाल पत्रक पाठवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत निकालपत्रक मिळतील व संबंधित महाविद्यालयातून लवकरात लवकर ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतील, अशी ग्वाही परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांकडून देण्यात आली. निवेदन देताना प्रदेश सचिव एनएसयूआयचे चेतन बाविस्कर, घनश्याम पाटील, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.