शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या नगराध्यक्षांसह 23 नगरसेवक अपात्र, जिल्हाधिका-यांचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:50 IST

अतिक्रमण हटावला स्थगिती देणे भोवले

ठळक मुद्देअतिक्रमण हटाव रोखण्याचा सभेतच केला ठरावजिल्हाधिका-यांकडे केली होती अपात्रतेची मागणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- अमळनेर येथील अतिक्रमण हटाव मोहिम थांबवून त्यांना संरक्षण देण्याचा पालिका सभेत ठराव करणा:या नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्यासह 23 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  सोमवार, 29 जानेवारी रोजी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनीदिली. या निकालाने  राजकीय वतरुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या निकालाबाबत जिल्हा प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात होती. 

अतिक्रमण हटाव रोखण्याचा सभेतच केला ठरावअमळनेर नगरपालिकाचे  मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांनी अतिक्रमण हटावची मोहिम सुरू करुन अतिक्रमण करणा:यांना नोटीसा दिल्या होत्या. ही कारवाई रोखण्याचा ठराव नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व इतर 22 नगरसेवकांनी पालिका सभेत केला होता.

जिल्हाधिका-यांकडे केली होती अपात्रतेची मागणीनगरपालिकेत सत्ताधारी गटाने सत्तेचा गैरवापर करीत अतिक्रमण हटाव मोहीम स्थगितेचा ठराव केला व कायद्याचे उल्लंघन केल्याने आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते  प्रवीणकुमार पाठक, उपनेत्या सविता संदानशिव, प्रतोद सलीम शेख यांनी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व इतर 22 नगरसेवकांविरोधात 12 जून 2017 रोजी जिल्हाधिका:यांकडे ठराव दाखल करून तत्काळ अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली होती. 

23 सदस्यांच्या अपात्रतेने पालिकेला खिंडारहे प्रकरण  जिल्हाधिका-यांसमोर आल्यानंतर साडेसात महिन्यांपासून या बाबतचा निर्णय रखडलेला होता.  अखेर सोमवारी या प्रकरणाचा जिल्हाधिका:यांनी निर्णय दिला. यात त्यांनी सर्व तथ्ये तपासून अतिक्रमणास अडथळे आणणा:या पदाधिका:यांना अपात्र ठरविणा:या कलमाचा वापर करुन नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र ठरविणारा निकाल 29 जानेवारी रोजी दिला. त्यामुळे 39 सदस्य संख्या असलेल्या अमळनेर पालिकेतील तब्बल 23 सदस्य अपात्र ठरल्याने पालिकेला  खिंडारच पडल्याचे बोलले जात आहे. 

अपात्र ठरलेले नगरसेवकनगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, नगरसेवक शीतल राजेंद्र यादव, नूतन महेश पाटील, संतोष भगवान पाटील, सुरेश आत्माराम पाटील, नरेंद्र रामभाऊ संदानशिव, निशातबानो अनीस खान कुरेशी, मनोज भाऊराव पाटील, गायत्री दीपक पाटील, अॅड. चेतना य™ोश्वर पाटील, विवेक भीमराव पाटील, निशांत राजेंद्र अग्रवाल, संजय आनंदा मराठे, चंद्रकला अशोक साळुंखे, कुमाररामकृष्ण बापुराव पाटील, राजेश शिवाजी पाटील, कमलबाई पितांबर पाटील, रत्नमाला साखरलाल माळी, रत्ना प्रकाश महाजन, विनोद रामचंद्र लांबोळे, प्रवीण साहेबराव पाटील, सलीम शेख फत्तू शेख, अभिषेक विनोद पाटील. 

काय आहे निकालअजर्दारांचा अर्ज मंजूर करण्यात येऊन नगराध्यक्ष व 22 नगरसेवकांना  नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965चे कलम 44 (1)(ई) अन्वये आदेश दिल्याच्या दिनांकापासून उर्वरित पदावधीसाठी अनर्ह (अपात्र) ठरविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. निकालाविरोधात अपील करायचे असल्यास ते राज्य शासनाकडे 15 दिवसात दाखल करता येणार आहे. 

जिल्हाधिका:यांचा शोधाशोधया निकालानंतर निकाल मिळविण्यासाठी अपात्र ठरलेल्यांचे वकील व इतर मंडळींनी तसेच पत्रकारांनी जिल्हाधिका:यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात नव्हते व भ्रमणध्वनीवरही संपर्क होऊ शकला नाही. नगरपालिका शाखेतूनही जिल्हाधिका:यांनी दिलेल्या निकालाबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्या, 30 जानेवारी रोजी या बाबत माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले जात होते. 

आरोपांनी ढवळून निघाले प्रकरण अमळनेर येथील भाजपाच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आणि 23 नगरसेवकांना अपत्रता प्रकरणातून वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने हा निकाल सध्या राखीव ठेवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पत्रपरिषद घेऊन  केला होता. इतकेच नव्हे राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सत्तेचा लाभ मिळविण्यासाठी प}ी पुष्पलता पाटील या नगराध्यक्षा असतानाही भाजपात पाठविले व आपण स्वत: राष्ट्रवादीतच राहिल्याचे अॅड. पाटील म्हणाले होते. मात्र शहरातील अतिक्रमणांना स्थगिती दिल्याच्या प्रकरणात आमदार शिरीष चौधरी गटाने जिल्हाधिका:यांकडे नगराध्यक्षा व 22 नगरसेवक अपात्र करावे अशी मागणी केल्याने या प्रकरणात अभय मिळवून देण्याचा शब्द स्थानिक भाजपा नेत्यांकडून मिळाल्याने साहेबराव पाटील हे भाजपात गेले, असाही आरोप डॉ.सतीश पाटील यांनी केला होता. जिल्हाधिका:यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या प्रकरणात न ऐकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागल्याचे सांगून  काही दिवसांपूर्वी जाहीर होणारा हा निकाल राखून ठेवला गेल्याचा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी केला होता.