शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शिवभोजन केंद्रातही ५० टक्के उपस्थितीची बंधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंसाठी मोठा आधार ठरत असलेल्या शिवभोजन केंद्रांची वेळ सोमवार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंसाठी मोठा आधार ठरत असलेल्या शिवभोजन केंद्रांची वेळ सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत वाढवून तेथे आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहे. या सोबतच शनिवार, रविवार केवळ पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान विविध व्यवहार बंद असल्याने राज्य सरकारच्यावतीने मजूर, स्थलांतरित, बेघर, आदींसाठी मोफत शिवभोजन देण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून वाटप होणाऱ्या ३ हजार ५०० थाळ्या कमी पडत असल्याने अनेक जण माघारी परतत जात होते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्राच्या थाळीचा इष्टांक दीडपट करण्यात आला व या ३८ शिवभोजन केंद्रांवरून ५ हजार १२५ थाळ्यांचे दररोज मोफत वितरण होत आहे.

कोरोना काळात गरजूंना हा आधार होत आहे. मात्र, कोरोनानंतर डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार शिवभोजन केंद्रांनाही बंधनांविषयी सूचना दिल्या आहेत.

या सूचनांनुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह शिवभोजन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार शिवभोजन केंद्रात बसून जेवण करता येईल; मात्र एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्केच उपस्थिती ठेवावी लागत आहे. या शिवाय शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सुविधा द्यावी लागणार असून, हे दोन दिवस केंद्रात बसून जेवण करता येणार नाही.

वेळ वाढविल्याने दिलासा

शिवभोजन केंद्रांचा वेळ पूर्वी दुपारी एक वाजेपर्यंतच होता. मात्र, आता निर्बंध लागू केले असले तरी यामध्ये वेळ वाढवून ती दुपारी चार वाजेपर्यंत केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत गर्दी टाळा

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दिलासा असला तरी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढविली व जळगाव जिल्हा पहिल्या टप्प्यातून थेट तिसऱ्या टप्प्यात गेला आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रांवरही गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्देश दिले. त्यानुसार वरील बंधने राहण्यासह केंद्रांवर मास्क वापरणे आवश्यक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत केंद्रात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत.