शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन केंद्रातही ५० टक्के उपस्थितीची बंधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंसाठी मोठा आधार ठरत असलेल्या शिवभोजन केंद्रांची वेळ सोमवार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंसाठी मोठा आधार ठरत असलेल्या शिवभोजन केंद्रांची वेळ सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत वाढवून तेथे आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहे. या सोबतच शनिवार, रविवार केवळ पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान विविध व्यवहार बंद असल्याने राज्य सरकारच्यावतीने मजूर, स्थलांतरित, बेघर, आदींसाठी मोफत शिवभोजन देण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून वाटप होणाऱ्या ३ हजार ५०० थाळ्या कमी पडत असल्याने अनेक जण माघारी परतत जात होते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्राच्या थाळीचा इष्टांक दीडपट करण्यात आला व या ३८ शिवभोजन केंद्रांवरून ५ हजार १२५ थाळ्यांचे दररोज मोफत वितरण होत आहे.

कोरोना काळात गरजूंना हा आधार होत आहे. मात्र, कोरोनानंतर डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार शिवभोजन केंद्रांनाही बंधनांविषयी सूचना दिल्या आहेत.

या सूचनांनुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह शिवभोजन केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार शिवभोजन केंद्रात बसून जेवण करता येईल; मात्र एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्केच उपस्थिती ठेवावी लागत आहे. या शिवाय शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सुविधा द्यावी लागणार असून, हे दोन दिवस केंद्रात बसून जेवण करता येणार नाही.

वेळ वाढविल्याने दिलासा

शिवभोजन केंद्रांचा वेळ पूर्वी दुपारी एक वाजेपर्यंतच होता. मात्र, आता निर्बंध लागू केले असले तरी यामध्ये वेळ वाढवून ती दुपारी चार वाजेपर्यंत केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत गर्दी टाळा

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दिलासा असला तरी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढविली व जळगाव जिल्हा पहिल्या टप्प्यातून थेट तिसऱ्या टप्प्यात गेला आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रांवरही गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्देश दिले. त्यानुसार वरील बंधने राहण्यासह केंद्रांवर मास्क वापरणे आवश्यक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत केंद्रात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी अशाही सूचना दिल्या आहेत.