शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जळगाव जिल्ह्यातील ४९ पैकी केवळ २० वाळू गटांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 17:25 IST

शासनाला मिळणार १३ कोटी २७ लाखांचा महसूल

ठळक मुद्देएकाच व्यक्तीच्या नावाने गेले ९ ठेकेई-निविदा व ई-लिलाव या दोन्ही पद्धतींचा अवलंब करीत त्यातून सर्वाधिक बोली असलेल्या मक्तेदाराला मक्ता महामार्गापासून जवळ २० गटांना प्रतिसाद

जळगाव: जिल्ह्यातील ४९ वाळू गटांचा ठेका देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ई-निविदा व ई-लिलाव या दोन्ही पद्धतींचा अवलंब करीत त्यातून सर्वाधिक बोली असलेल्या मक्तेदाराला मक्ता देण्याची पद्धत अवलंबली होती. त्यानुसार गुरूवारी ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीच्या दरांचा तुलनात्मक तत्कार करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यात ४० पैकी केवळ २० गटांनाच मक्तेदारांनी प्रतिसाद दिला असून एकूण १३ कोटी २६ लाख ५३ हजार३४१ रूपयांचा महसूल यातून शासनाला मिळणार आहे. जिल्ह्यातील ४९ वाळू गटांसाठी ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीने मक्ता दिला जाणार असल्याने ई-निविदेसाठी सोमवार, २७ रोजी शेवटची मुदत होती. ई-लिलावातील बोली व ई-निविदेत आलेली बोली याचा तुलनात्मक तक्ता करून जादा बोली असलेल्या मक्तेदाराला मक्ता दिला जाणार होता. त्यानुसार १४ ते २७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. मात्र त्यास मक्तेदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. जेमतेम १२ ते १५ मक्तेदारांनीच आॅनलाईन नोंदणी केली. तसेच याच कालावधीत आॅनलाईन ‘ई-निविदा’ सादर करावयाची होती. त्यानुसार ‘ई-निविदांची’ मुदत सोमवारी संपली.  ‘ई-लिलाव’ २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात झाला. या ई-निविदा व ई-लिलाव यांच्यात प्रत्येक गटासाठी लावण्यात आलेल्या बोलीचा तुलनात्मक तक्ता तयार करून सर्वाधिक बोली बोललेल्या मक्तेदारांना मक्ता देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.महामार्गापासून जवळ २० गटांना प्रतिसाद४९ वाळू गटांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र जेमतेम २० वाळू गटांनाच मक्तेदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यातही राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून या चौपदरीकरणासाठी संबंधीत मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात वाळूची गरज भासणार आहे. हा मोठा ग्राहक डोळ्यासमोर ठेवत महामार्गापासून जवळ असलेल्या वाळू गटांना मक्तेदारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.नवीन ठेकेदारांचा उदय?वाळू ठेके घेणारे काही ठराविक लोकच दरवर्षी ठेका घेण्यासाठी येत असतात. मात्र यंदा मागील वर्षीच्या ठेकेदारांपैकी केवळ एकाच ठेकेदाराचे नाव या २० ठेके घेणाºयांमध्ये दिसून येत आहे. तर राजेंद्र मोहनलाल जैन नामक एकाच व्यक्तीने ९ ठेके घेतल्याचे समजते. त्यामुळे आधीच्या ठेकेदारांचे दर कमी असल्याने ते बाद झाले की त्यांनीच एमपीडीएच्या धाकाने अन्य व्यक्तीच्या नावाने ठेके घेतले? याबाबत उत्सुकता कायम आहे.बोली आलेले वाळू गटनांदेड भाग १ (धरणगाव, तापी नदी), टाकरखेडा (एरंडोल, गिरणा नदी), वैजनाथ (एरंडोल, गिरणा), दोनगाव खु. (धरणगाव, गिरणा), बेलव्हाय १ (भुसावळ, वाघूर नदी), बेलव्हाय २ (भुसावळ, वाघूर), बेलव्हाय ३ (भुसावळ, वाघूर), गोभी (भुसावळ, वाघूर), सुनसगाव (भुसावळ, वाघूर),भानखेडे (भुसावळ, तापी), जोगलखेडे (भुसावळ, वाघूर), पिंप्रीनांदु (मुक्ताईनगर, तापी), पथराड (यावल, तापी), शिरागड १ (यावल, तापी), शिरागड २ (यावल, तापी), कुरंगी (पाचोरा, गिरणा), खापरखेडे प्र.ज. (अमळनेर, तापी), कोळंबा (चोपडा, तापी), कुरवेल (चोपडा, तापी), भऊर  (चाळीसगाव, गिरणा)सर्वाधिक बोली दोनगाव खु. गटालाया २० वाळू गटांपैकी देखील ८०४६ ब्रास वाळूसाठा असलेल्या दोनगाव खु. वाळू गटाला सर्वाधिक ३ कोटी १५ लाख ९३ हजार १८८ रूपयांची बोली मिळाली. त्यापाठोपाठ ६३०७ ब्रास वाळूसाठा असलेल्या नांदेड भाग १ वाळू गटाला २ कोटी १० लाखाची सर्वाधिक बोली लागली. २०७८ ब्रास वाळूसाठा असलेल्या वैजनाथ वाळूगटाला १ कोटी ९० लाख १० हजार रूपयांची बोली मिळाली. तर ३५६२ ब्रास वाळूसाठा असलेल्या खापरखेडे प्र.ज. वाळूगटाला १ कोटी ८१ लाखांची तर त्यापाठोपाठ ३५६२ ब्रासच वाळू साठा असलेल्या कुरंगी वाळू गटाला १ कोटी २१ लाखांची बोली मिळाली. उर्वरीत वाळू गटांना लाखांमध्ये बोली लागली. यातून एकूण १३ कोटी २६ लख ५३ हजार ३४१ रूपयांचा महसूल शासनाला मिळणार आहे.