शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:24 IST

राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण

सचिन देवजळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना पाचोरा, चाळीसगाव या ठिकाणी थांबा मिळण्याची प्रवाशी संघटनांकडून मागणी सुरु होती. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर साडेचार वर्षांत या पैकी कुठलीही मागणी मान्य होत नसल्यामुळे प्रवाशी संघटनांकडून खासदारांकडे पाठपुरावा सुरु होता आणि पुढील आठवड्यात या दोन्ही गाड्यांना पाचोरा व चाळीसगाव या टिकाणी थांबा मिळणार असल्याने प्रवाशाांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, साडेचार वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला आत्ताच फळ मिळाल्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना खूष करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या गुलाबी थंडीत जोरदार सुरु आहे.भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी पासून अनेक लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांना जळगाव व भुसावळ व्यक्तीरिक्त कुठल्याही स्थानकावर थांबा नव्हता. या मुळे प्रवाशांना जळगाव किंवा भुसावळला जाऊन ही गाडी पकडावी लागायची. चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान दररोज दोन हजार चाकरमानी अफडाऊन करत असतात. सकाळ व सायंकाळ धावणारी पँसेजर व इतर ठराविक गाड्यानांच थांबा असल्यामुळे प्रवाशांची अफडाऊनसाठी तारेवरची कसरत व्हायची. जर यदा कदाचीत गाडी सुटली तर तिप्पट भाडे खर्च करुन, चाळीसगावहून जळगावला यावे लागायचे व यामुळे मनस्तापदेखील व्हायचा.शेवटी प्रवाशांच्या पाठपुराव्याला निवडणुकीच्या तोंडावर का असेना, यश मिळाल्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाचणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांच्या आनंदाला पारा उरलेला नाही. सोशल मीडियावर प्रवाशी संघटनांकडून तर खासदार ए. टी. पाटील व खासदर रक्षा खडसे यांच्या आभाराचे दर सेंकदाला बँनर झळकत आहेत. दुसरीकडे प्रवासी संघटनांमध्येदेखील ‘श्रेय’ लाटण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर जोरदार जाहिरात बाजी सुरु आहे.जाता जाता -गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी गेल्या महिनाभरात झटापट पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रवाशी मित्रांनी यावर समाधानी न होता, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मुंबई-भुसावळ पँसेजर, नाशिक -भुसावळ पँसेजर या गाड्यांना जादा डबे जोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच हुतात्माची पुण्याला जाण्यासाठी रात्रीची १२ ची वेळ असल्यामुळे, अनेक प्रवाशांना त्रास होत असून,या गाडीची वेळ बदलणे गरजेचे आहे. तसेच चाकरमान्यासांठीदेखील मनमाड ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र गाडी सुरु करणे गरजेचे आहे.