शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:24 IST

राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण

सचिन देवजळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना पाचोरा, चाळीसगाव या ठिकाणी थांबा मिळण्याची प्रवाशी संघटनांकडून मागणी सुरु होती. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर साडेचार वर्षांत या पैकी कुठलीही मागणी मान्य होत नसल्यामुळे प्रवाशी संघटनांकडून खासदारांकडे पाठपुरावा सुरु होता आणि पुढील आठवड्यात या दोन्ही गाड्यांना पाचोरा व चाळीसगाव या टिकाणी थांबा मिळणार असल्याने प्रवाशाांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, साडेचार वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला आत्ताच फळ मिळाल्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवाशांना खूष करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या गुलाबी थंडीत जोरदार सुरु आहे.भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी पासून अनेक लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांना जळगाव व भुसावळ व्यक्तीरिक्त कुठल्याही स्थानकावर थांबा नव्हता. या मुळे प्रवाशांना जळगाव किंवा भुसावळला जाऊन ही गाडी पकडावी लागायची. चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान दररोज दोन हजार चाकरमानी अफडाऊन करत असतात. सकाळ व सायंकाळ धावणारी पँसेजर व इतर ठराविक गाड्यानांच थांबा असल्यामुळे प्रवाशांची अफडाऊनसाठी तारेवरची कसरत व्हायची. जर यदा कदाचीत गाडी सुटली तर तिप्पट भाडे खर्च करुन, चाळीसगावहून जळगावला यावे लागायचे व यामुळे मनस्तापदेखील व्हायचा.शेवटी प्रवाशांच्या पाठपुराव्याला निवडणुकीच्या तोंडावर का असेना, यश मिळाल्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाचणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या राजधानी एक्सप्रेसचीदेखील मागणी पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांच्या आनंदाला पारा उरलेला नाही. सोशल मीडियावर प्रवाशी संघटनांकडून तर खासदार ए. टी. पाटील व खासदर रक्षा खडसे यांच्या आभाराचे दर सेंकदाला बँनर झळकत आहेत. दुसरीकडे प्रवासी संघटनांमध्येदेखील ‘श्रेय’ लाटण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर जोरदार जाहिरात बाजी सुरु आहे.जाता जाता -गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी गेल्या महिनाभरात झटापट पूर्ण झाल्यामुळे, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रवाशी मित्रांनी यावर समाधानी न होता, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मुंबई-भुसावळ पँसेजर, नाशिक -भुसावळ पँसेजर या गाड्यांना जादा डबे जोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच हुतात्माची पुण्याला जाण्यासाठी रात्रीची १२ ची वेळ असल्यामुळे, अनेक प्रवाशांना त्रास होत असून,या गाडीची वेळ बदलणे गरजेचे आहे. तसेच चाकरमान्यासांठीदेखील मनमाड ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र गाडी सुरु करणे गरजेचे आहे.