शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

रस्त्यांबाबत अहवाल द्या

By admin | Updated: April 11, 2017 00:54 IST

मुख्यमंत्र्यांकडून दखल : मनपाकडून आठवडा उलटूनही दखल नाही

जळगाव : शहरात सतत होणा:या अपघातांवर उपाय योजना करण्यासाठी  शहरातील मुख्य  रस्ते, समांतर रस्ते व उड्डाणपूल विकासाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल नगरविकास विभागाने स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तत्काळ मागविला आहे.  हे पत्र 30 मार्च रोजी प्राप्त होऊनही मनपाने अद्याप त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविलेला नाही. शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग क्र.6वर सातत्याने होत असलेल्या अपघातांमध्ये निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने समांतर रस्त्यांचा तातडीने विकास करणे, तसेच शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल करून बाह्य वळण रस्त्याचे कामही तातडीने करण्याची मागणी होत आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जळगाव फस्र्टच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनही करण्यात आले. जाहीर सभाही घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिका:यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची बैठक घेऊन समांतर रस्ते, शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल यासाठी सुमारे 350 कोटीचा विकास आराखडा                    तयार करण्यात  येऊन  ता े मंजुरीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 23 जानेवारी रोजीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या समस्या सोडविण्यासाठी विकास कामांना गती देणे आवश्यक असून त्यादृष्टीने या निवेदनाचा विचार व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास विभागाच्या कक्ष अधिका:यांनी 27 मार्च रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या समस्यांच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागविला आहे. जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शहरात सातत्याने होत असलेल्या अपघातांवर उपाय होण्यासाठी शहरातून जाणा:या महामार्गाला समांतर रस्ते व्हावेत, तसेच 100 वर्ष जुना शिवाजीनगर, पिंप्राळा, सुरत रेल्वे गेट, असोदा रेल्वे गेट, कालिंका माता चौक ते अजिंठा चौक, ईच्छादेवी ते आकाशवाणी चौक, तसेच पॉलिटेकAीक कॉलेजजवळ उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती. याखेरीज शहरातील औद्योगिक क्षेत्र वाढवून नवीन औद्योगिक प्लॉटस् उपलब्ध करून देणे, महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प कार्यालय जळगावात व्हावे, जळगाव-चोपडा-शिरपूर, ममुराबाद-यावल-शिरपूर व एरंडोल-म्हसावद-नेरी हे रस्ते चौपदरी करण्याची मागणी केली होती.