शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी संरक्षक कायदाच रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST

जळगाव जिल्ह्यात बिबट्यांची उत्पत्ती पाहता अन्नाच्या शोधात ते जंगल सोडून शेतांमध्ये वावरत आहेत. भीतीदायक वातावरणात काम करण्याची स्थिती शेतकऱ्यांवर ...

जळगाव जिल्ह्यात बिबट्यांची उत्पत्ती पाहता अन्नाच्या शोधात ते जंगल सोडून शेतांमध्ये वावरत आहेत. भीतीदायक वातावरणात काम करण्याची स्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात हरण व रानडुक्कर यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वाडे, सावदे, दलवाडे परिसरात रानडुकरे आदी वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केले असून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने या संघटनेमार्फत या वृत्ताचे कौतुक करण्यात आले आहे.

शासनाचा वन्य प्राणी संरक्षण कायदा असल्यामुळे शेतकऱ्यांना प्राण्यांना प्रत्युत्तर देता येत नाही. मात्र मागील काही वर्षांपासून बिबट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला करून घायाळ केले आहे. काही शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. शेतात मजूर कामाला यायला तयार नाहीत. बिबट्या मादी वर्षातून चार पिलांना जन्म देते व वयाच्या चाळिशीपर्यंत पिलांना जन्म देत असते. त्यात नवीन जन्माला घातलेले मादी बिबट्या वर्षातून दोनदा पिलांना जन्म देतात, यांचा गुणाकार केला तर काही दिवसांत प्रत्येक शेतात बिबटेच बिबटे दिसतील व शेतकऱ्यांना नि:शस्त्र त्यांचा सामना करावा लागेल. एक दिवस शेतकरीच त्यांचे खाद्य बनवून देईल, असे या संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

शासनाने वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा अन्यथा शेतकऱ्यांना शस्त्र परवाना द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण करता येईल. हरण, रानडुक्कर, गवा, नीलगाई हे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात अतोनात नुकसान करत असतात. त्यांचाही बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय महाजन, उपाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी, अखिलेश पाटील, विनोद धनगर, खुशाल सोनवणे, नंदलाल पाटील, विनोद पाटील, देवेंद्र पाटील, विजय पाटील, अजित पाटील, वैभव पाटील यांनी ही मागणी केलेली आहे.