शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शहरातील सहा रस्त्यांची दिवाळीपूर्वीच नव्याने दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बांधकाम विभागाकडे हस्तांतर झालेल्या रस्त्यांची दिवाळीपूर्वीच तातडीने दुरुस्ती करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील बांधकाम विभागाकडे हस्तांतर झालेल्या रस्त्यांची दिवाळीपूर्वीच तातडीने दुरुस्ती करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत. शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांनी त्रस्त असून, रस्ते मनपाच्या की बांधकाम विभागाच्या हद्दीत हा वाद प्रशासकीय पातळीवर सोडून आधी जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्या अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृह येथे शुक्रवारी सर्वच विभागांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, अमर जैन, नितीन बरडे यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महारेलचे अधिकारी व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील सहा रस्त्यांचा विषय ‘लोकमत’ने लावून धरला असून, याच वृत्ताची दखल घेत पालकमंत्र्यांनी याबाबतचा आढावा घेतला आहे.

बैठकीत या विषयांवर झाली चर्चा

१. मनपाकडून बांधकाम विभागाकडे वर्ग झालेल्या सहा रस्त्यांवरील अतिक्रमण मनपाने गणेश विसर्जनानंतर तीन दिवसांच्या आत काढण्यात यावे.

२. बांधकाम विभागाला या रस्त्यांवरील कामांसाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी शहरातील रस्त्यांची कामे रखडणार नाही याकडे काळजी घेण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

३. ६ रस्त्यांबाबत मनपाने बांधकाम विभागाला तातडीने नाहरकरत देण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

डीपीडीसीतून तीन कोटींचा निधी देणार

शहरातील सहा रस्त्यांवरील कामे तातडीने करणे गरजेचे असून, राज्य शासनाच्या व इतर तांत्रिक बाबींमध्ये अडकल्यास नागरिकांचा प्रश्न रखडू शकतो. त्यामुळे तातडीने डीपीडीसीतून तीन ते चार कोटींची तरतूद करून शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

शहरातील प्रमुख चौकांचे होणार सुशोभीकरण

या बैठकीला उपस्थित असलेले न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौकांचे सुशोभीकरण करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच बहिणाबाई चौक, रिंगरोड चौक, टॉवर चौक, स्वातंत्र्य चौक आणि अन्य चौकांसाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करावेत, आपण नगरविकास खात्याकडून यासाठी निधी मंजूर करून आणू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

आसोदा रेल्वे गेटचे काम बांधकाम विभागाकडे वर्ग करा

आसोदा येथील उड्डाणपुलासाठी राज्य सरकारने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी रेल्वे प्रशासनाने याचे काम आपल्याकडे घेतले आहे. हे काम पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत. भोईटेनगर रेल्वे गेटसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी रेल्वे प्रशासनामुळे या दोन्ही गेटचे मूल्य आता वाढल्याने याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केला.