शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

शहरातील सर्व बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेत्यांना हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील सर्व बाजारपेठ परिसरासह उपनगरांमध्ये भरणाऱ्या बाजारांमधील विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील सर्व बाजारपेठ परिसरासह उपनगरांमध्ये भरणाऱ्या बाजारांमधील विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजेनंतर मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या भागात एकाच वेळी कारवाया केल्या. यामध्ये १०० हून अधिक विक्रेत्यांचा माल देखील जप्त करण्यात आला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात महापालिकेच्या पथकाकडून नियमित पाहणी होत असल्याने या भागात व्यवसाय करण्यासाठी अनेक भाजीपाला विक्रेते दचकतात मात्र गणेश कॉलनी चौक, बजरंग बोगदा परिसर, मास्टर कॉलनी, काशीबाई उखाजी कोल्हे शाळा परिसर या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटत लहान बाजारच भरवले आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी मुख्य बाजारपेठ परिसर व्यतिरिक्त शहरातील उपनगरांमध्ये भरणाऱ्या या बाजारांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. काशीबाई उखाजी शाळा परिसरात ५० ते ६० विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत मनपाच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर या भागात जाऊन भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासह अनेक विक्रेत्यांना समज देखील देण्यात आली.

महापालिकेकडून वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महापालिकेच्या पथकाकडून शहरात दररोज कारवाई मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर देखील शहरातील अनेक भागांमध्ये भाजीपाला विक्रीसह इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच या बाजारांमध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन देखील होत नसल्याने कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने पसरत आहे. त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना देखील सुरू झाल्यामुळे बाजारात दुकाने बंद असतानाही खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी देखील होत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व लपून-छपून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागात २० अतिरिक्त कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून देखील वर्ग दोनच्या अधिकाऱ्याची नियुक्ती यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.