शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी परिषदेच्या बैठकीचा उमविला विसर

By admin | Updated: January 14, 2015 15:11 IST

आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही.

जळगाव : आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या बैठकीचा विसर पडला की काय? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धामधूममध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. या निवडणुका आटोपल्यानंतर यशावकाश विद्यापीठाने १६ नोव्हेंबरला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेतली. मात्र, निवडणूक होऊन दोन महिने झाले तरीही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी व विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती व्हावी या उद्देशाने राज्यातील सर्व विद्यापीठात विद्यार्थी परिषदेची स्थापना केली जाते. अध्यक्ष व सचिव यांच्यासह सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे केली जाते. त्यानुसार यावर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदाची सौरभ देशमुख व सचिवपदाची राहुल गावीत यांनी सूत्रे स्वीकारली.
अध्यक्ष भडगाव पालिकेच्या निवडणुकीत व्यस्त
दोन महिने झाले अद्याप विद्यार्थी परिषदेची बैठक का झाली नाही? याबाबत 'लोकमत'ने अध्यक्ष देशमुख व सचिव गावीत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता देशमुख म्हणाले की, भडगावची नगरपालिकेची निवडणूक लागल्यामुळे या निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या सोडवत आहोत. १६ जानेवारीला दुपारी एक वाजता विद्यार्थी परिषदेची बैठक घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी
सचिव गावीत याने विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी आहे. तसेच युवारंगच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे विद्यापीठातील अधिकार्‍यांशी चर्चा होऊ शकत नसल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. 
--------
दरम्यान, नियमानुसार विद्यार्थी परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सात दिवसांच्या आत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची तत्काळ बैठक बोलवली जाते. यात सदस्यांना नियमावली समजून सांगितली जाते. मात्र, यंदा ही बैठकदेखील झालेली नाही, असे सचिव गावीत यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.