शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

विद्यार्थी परिषदेच्या बैठकीचा उमविला विसर

By admin | Updated: January 14, 2015 15:11 IST

आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही.

जळगाव : आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या बैठकीचा विसर पडला की काय? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धामधूममध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. या निवडणुका आटोपल्यानंतर यशावकाश विद्यापीठाने १६ नोव्हेंबरला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेतली. मात्र, निवडणूक होऊन दोन महिने झाले तरीही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी व विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती व्हावी या उद्देशाने राज्यातील सर्व विद्यापीठात विद्यार्थी परिषदेची स्थापना केली जाते. अध्यक्ष व सचिव यांच्यासह सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे केली जाते. त्यानुसार यावर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदाची सौरभ देशमुख व सचिवपदाची राहुल गावीत यांनी सूत्रे स्वीकारली.
अध्यक्ष भडगाव पालिकेच्या निवडणुकीत व्यस्त
दोन महिने झाले अद्याप विद्यार्थी परिषदेची बैठक का झाली नाही? याबाबत 'लोकमत'ने अध्यक्ष देशमुख व सचिव गावीत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता देशमुख म्हणाले की, भडगावची नगरपालिकेची निवडणूक लागल्यामुळे या निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या सोडवत आहोत. १६ जानेवारीला दुपारी एक वाजता विद्यार्थी परिषदेची बैठक घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी
सचिव गावीत याने विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी आहे. तसेच युवारंगच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे विद्यापीठातील अधिकार्‍यांशी चर्चा होऊ शकत नसल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. 
--------
दरम्यान, नियमानुसार विद्यार्थी परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सात दिवसांच्या आत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची तत्काळ बैठक बोलवली जाते. यात सदस्यांना नियमावली समजून सांगितली जाते. मात्र, यंदा ही बैठकदेखील झालेली नाही, असे सचिव गावीत यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.