शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

६०० स्क्वेअर फुटापेक्षा कमी अनधिकृत बांधकाम असलेल्यांना शास्तीमध्ये दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

महासभेत बहुमताने घेतला गेला निर्णय : एक हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम असलेल्यांकडून मात्र दुप्पट वसुली अजय पाटील लोकमत न्यूज ...

महासभेत बहुमताने घेतला गेला निर्णय : एक हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम असलेल्यांकडून मात्र दुप्पट वसुली

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांकडून दुप्पट शास्ती वसुलीमध्ये सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गुरुवारी झालेल्या महासभेत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, शहरातील ६०० स्क्वेअर फुटापेक्षा कमी अनधिकृत बांधकाम असलेल्यांना नागरिकांच्या शास्तीमध्ये दिलासा देण्यात आला आहे. शासन निर्णयाच्या आधारावर हा निर्णय घेतला असून, शहरातील अनेक नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

शहरात अनेक ठिकाणी नवीन बांधकाम करताना मनपाची परवानगी न घेताच अनधिकृत बांधकाम करून घेतले आहे. अशी बांधकामे मनपाकडून तोंडण्यात येत होती. मात्र, काही वर्षांपूर्वी शासनाने अनधिकृत बांधकामे न तोडता त्याबाबत संबंधित बांधकामधारकाने दंड भरून ती बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मूळ मालमत्ता कराच्या रकमेसह दुप्पट शास्ती आकारण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यात आणखीन शासनाने पुन्हा निर्णय घेत ६०० स्क्वेअर फुटापेक्षा कमी अनधिकृत बांधकाम असलेल्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याने, या निर्णयाची अंमलबजावणीसाठी मनपाकडून महासभेपुढे विषय ठेवण्यात आला होता. या ठरावाला अखेर महासभेने मंजुरी दिल्यामुळे अनेकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

..अशी होणार आकारणी

६०० स्क्वेअर फुटापेक्षा कमी अनधिकृत बांधकामधारक - शास्तीमध्ये पूर्ण माफी, मूळ मालमत्ता कराची रक्कम होणार वसूल

६०० ते १ हजार स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकामधारक - १ टक्का शास्तीसह मालमत्ता कराची रक्कम होणार वसूल

१ हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त अनधिकृत बांधकामधारक - दुप्पट शास्तीसह मालमत्ता कराचीही रक्कम होणार वसूल

आधीची भरलेली रक्कमही मिळणार परत

६०० स्क्वेअर फुटापेक्षा कमी अनधिकृत बांधकामधारकांनी मनपाकडे आधी दुप्पट शास्तीपोटी जी रक्कम भरली आहे, ती रक्कमदेखील मनपाकडून परत दिली जाणार आहे. मात्र, ही रक्कम प्रत्यक्ष न देता मालमत्ताकराच्या रक्कमेत समायोजित केली जाणार आहे. हीच बाब ६०० ते १ हजार स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकामधारकांनादेखील लागू होणार आहे. शहरातील अनेक नागरिकांनी मूळ मालकाकडून जागा किंवा घर खरेदी केल्यानंतर अनधिकृत बांधकामाची माहिती नसते, अशांची फसवणूक ही झाली असते. त्यामुळे अशा नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.