शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वॉटरग्रेसच्या ‘खुशी’ ला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यात काम सुरू केल्यानंतर नगरसेवकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यात काम सुरू केल्यानंतर नगरसेवकांच्या तक्रारी बंद झाल्या आहेत; मात्र यामागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप सातत्याने होत असून, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी थेट ६० नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून महिन्याला १५ हजार रुपयांप्रमाणे हप्ता घेतल्याचा आरोप केला होता. मात्र,

सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलिसांनी केलेल्या तपासणीत वॉटरग्रेसची कागदपत्रे व डायरी सापडल्याने या महिन्याची वॉटरग्रेसची

‘खुशी’ ला अनेक नगरसेवकांनी दाराबाहेरूनच नकार दिल्याचे समोर आले आहे.

मनपाकडून सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिल्यानंतर हा मक्ता चांगलाच गाजत आहे. पहिल्या टप्प्यात कामाच्या तक्रारीनंतर या

कंपनीचे काम थांबविण्यात आले होते; मात्र चार महिन्यांचा ‘ब्रेक’ नंतर पुन्हा वॉटरग्रेसच्या कामाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात

वॉटरग्रेसच्या कामाच्या तक्रारी थांबल्या असल्या तरी नगरसेवकांबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. नगरसेवकांनी वॉटरग्रेसकडून १५

हजारांची ‘खुशी’ मिळत असल्याचे आरोप अनेकांकडून होत आहेत.

डायरीतील नावे अन‌् भीती वाढली

बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात पोलिसांनी तपासणी केल्यानंतर याठिकाणी वॉटरग्रेसची कागदपत्रेही आढळून आली.

तसेच पोलिसांना याठिकाणी डायरी सापडली असून, या डायरीत काही जणांची शॉर्ट नावे सापडली आहेत अन‌् त्यापुढे काही आकडे देखील

आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून चौकशी होण्याच्या शक्यतेने ठराविक नगरसेवकांमध्ये भीती वाढली आहे. यामुळे अनेकांनी या

महिन्याचा ‘वॉटरग्रेस’ च्या ‘खुशी’ला दुरूनच नकार दिला आहे. दरम्यान, काही मनपा कर्मचाऱ्यांनी ही रक्कम नाकारली असल्याचीही

माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. बड्या नगरसेवकाकडे हे वाटपाचे काम होते. मात्र, त्यानेही रक्कम देण्यास व व्हॉट्सॲपवरून कॉल

करण्यासही नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर ज्या नगरसेवकांनी ही रक्कम घेतली होती, त्यापैकी अनेकजण ही

रक्कम परत करण्याचा तयारीत आहेत.

‘घरकूल’मधून बोध

घरकूल प्रकरणात अनेकांचा प्रत्यक्ष सहभाग नसतानाही केवळ स्वाक्षरी व ठरावामुळे शिक्षा भोगावी लागली आहे. यामुळे वॉटरग्रेसमध्ये

देखील अशा प्रकारे फसण्याची शक्यता असल्याने अनेकांनी यापासून दूर राहणेच आता पसंत केले आहे. तसेच वॉटरग्रेसबाबत ॲड.विजय पाटील यांनीही काही नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे. त्याबाबत नगरसेवकांमध्ये भीती वाढली आहे.