शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मुंबईसाठी नियमित विमानसेवेला होणार आणखी विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:16 IST

कोरोनाच्या काळात सध्या अहमदाबाद ते जळगाव नियमित सेवा सुरू असली तरी, गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईची विमानसेवा आठवड्यातून एकच दिवस ...

कोरोनाच्या काळात सध्या अहमदाबाद ते जळगाव नियमित सेवा सुरू असली तरी, गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईची विमानसेवा आठवड्यातून एकच दिवस सुरू आहे. यामुळे जळगावहून मुंबईला जाणाऱ्या व्यापारी व उद्योजकांची गैरसोय होत आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या विमानतळ विकास समितीच्या बैठकीत सदस्यांनीही नाराजी व्यक्त करून, मुंबईची विमानसेवा नियमित सुरू ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य शासनातर्फे खबरदारी म्हणून मुंबई विमानतळावरील अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांना बंदी घातली आहे. यात जळगावला विमानसेवा देणाऱ्या विमान कंपनीचाही समावेश आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात राज्य शासनाने मुंबई विमानतळावरील काही निर्बंध उठवून, २ मार्चपासून आठवड्यातून चार दिवस मुंबईची विमानसेवा होणार होती. मात्र, मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्याने ही सेवा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने गेल्या आठवड्यात टर्मिनल-१ सुरू करण्याची घोषणा केल्यामुळे, १२ मार्चपासून जळगावाहून मुंबईची विमानसेवा नियमित सुरू होणार होती. मात्र, राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध घातल्यामुळे, मुंबईची विमानसेवा पुन्हा स्थगित झाली आहे.

इन्फो :

मार्च अखेरपर्यंत नियमित सेवेची शक्यता नाही

विमान कंपनीतर्फे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये मुंबई विमानतळावर अतिमहत्त्वाच्या मर्यादित उड्डाणांनाच परवानगी देण्यात आली आहे. जोपर्यंत राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही, तोपर्यंत विमानतळावरील निर्बंध कडक राहणार आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत मुंबईची विमानसेवा नियमित सुरू होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन, नियमित विमानसेवेला शासनाने परवानगी देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.