शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
2
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
3
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
4
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
5
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
6
बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण?
7
दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...
8
Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक
9
"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट
10
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
11
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
12
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
13
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
14
Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!
15
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
16
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
17
'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."
18
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
19
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!

नोंदणी करा; मात्र धान्य खरेदी करणे आमच्यावर बंधनकारक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : राज्य शासनाकडून जिल्ह्यात अद्यापही रबी हंगामातील गहू, दादर व मका खरेदीला सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : राज्य शासनाकडून जिल्ह्यात अद्यापही रबी हंगामातील गहू, दादर व मका खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात सतरा केंद्रांवर ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी केली असली तरी खरेदी बंधनकारक नसल्याचा अजब फतवा काढण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

रबी हंगाम काढल्यानंतरदेखील राज्य शासनाकडून अजूनही शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यात खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली असली तरी याठिकाणी नोंदणी केली तरी हा माल शासन खरेदी करेल की नाही, याबाबत शासनाने अजूनसुद्धा कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही. शेतकऱ्यांना केवळ खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर’

अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सद्य:स्थितीत पैशांची आवश्यकता असून, रबी हंगामात आलेल्या पिकांची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाची तयारीला वेळ द्यावा लागणार आहे. खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राधान्य शासकीय खरेदी केंद्रावरच माल विक्री करण्यास असते. मात्र, दरवर्षी शासकीय खरेदी ही शेतकऱ्यांनी शेतातून माल काढल्यानंतर तब्बल महिना, दोन महिन्यांनंतर सुरू होत असते. शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी नाइलाजास्तव व्यापाऱ्यांना कमी भावात माल विक्री करतात, तर अनेक शेतकऱ्यांनी आपला माल अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू होईल या आशेने घरात साठवून ठेवला आहे, तसेच शासनाच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणीदेखील केली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यात आले नाही, तर शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल व्यापाऱ्यांना विक्री करावा लागेल. त्यामुळे शासनाने नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा माल खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मग शासकीय खरेदी केंद्रे सुरूच का केली जातात?

शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याबाबत शासनाची स्पष्ट भूमिका नसेल, तर शासनाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचे ढोंग तरी करू नये, अशा तीव्र शब्दांत शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सद्य:स्थितीत शासकीय खरेदी केंद्रावर दादरला २,६०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव आहे, तर खासगी व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांना १,४०० ते १,५०० रुपये दराने आपला माल विक्री करावा लागत आहे. जर शासनाने शेतकऱ्यांचा माल घेण्यास नकार दिला, तर त्या शेतकऱ्यांना आपला माल एक हजार ते दीड हजार रुपये कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री करावा लागेल.

कोट..

राज्य शासनाचे धोरण एकदम चुकीचे आहे, एकीकडे लग्नाचे आमंत्रण शासनाकडून दिले जाते आणि दुसरीकडे लग्नात जेवण मिळेल की नाही, याबाबत कोणतीही शास्त्रीय माहिती दिली जात नसल्याचे या पत्रावरून दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याचा माल हा शासनाने खरेदी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा माल नोंदणी करूनदेखील खरेदी नाही करण्यात आला, तर शेतकऱ्यांच्या संतापला सामोरे जावे लागेल.

-किशोर चौधरी, प्रगतिशील शेतकरी, असोदा

गेल्या वर्षीदेखील मका खरेदीच्या वेळेस शेतकऱ्यांची नोंदणी करूनदेखील त्यांचा माल खरेदी करण्यात आला नव्हता, तसेच यावर्षीदेखील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याबाबत शासन स्पष्ट भूमिका घेताना दिसून येत नाही. जर नोंदणी करूनदेखील शेतकऱ्याचा माल खरेदी केला जात नसेल, तर शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचा उद्देश काय?

-ॲड. हर्षल चौधरी, पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी