शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी करा; मात्र धान्य खरेदी करणे आमच्यावर बंधनकारक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : राज्य शासनाकडून जिल्ह्यात अद्यापही रबी हंगामातील गहू, दादर व मका खरेदीला सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : राज्य शासनाकडून जिल्ह्यात अद्यापही रबी हंगामातील गहू, दादर व मका खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात सतरा केंद्रांवर ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी केली असली तरी खरेदी बंधनकारक नसल्याचा अजब फतवा काढण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

रबी हंगाम काढल्यानंतरदेखील राज्य शासनाकडून अजूनही शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यात खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली असली तरी याठिकाणी नोंदणी केली तरी हा माल शासन खरेदी करेल की नाही, याबाबत शासनाने अजूनसुद्धा कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही. शेतकऱ्यांना केवळ खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर’

अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सद्य:स्थितीत पैशांची आवश्यकता असून, रबी हंगामात आलेल्या पिकांची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाची तयारीला वेळ द्यावा लागणार आहे. खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राधान्य शासकीय खरेदी केंद्रावरच माल विक्री करण्यास असते. मात्र, दरवर्षी शासकीय खरेदी ही शेतकऱ्यांनी शेतातून माल काढल्यानंतर तब्बल महिना, दोन महिन्यांनंतर सुरू होत असते. शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी नाइलाजास्तव व्यापाऱ्यांना कमी भावात माल विक्री करतात, तर अनेक शेतकऱ्यांनी आपला माल अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू होईल या आशेने घरात साठवून ठेवला आहे, तसेच शासनाच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणीदेखील केली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यात आले नाही, तर शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल व्यापाऱ्यांना विक्री करावा लागेल. त्यामुळे शासनाने नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा माल खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मग शासकीय खरेदी केंद्रे सुरूच का केली जातात?

शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याबाबत शासनाची स्पष्ट भूमिका नसेल, तर शासनाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचे ढोंग तरी करू नये, अशा तीव्र शब्दांत शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सद्य:स्थितीत शासकीय खरेदी केंद्रावर दादरला २,६०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव आहे, तर खासगी व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांना १,४०० ते १,५०० रुपये दराने आपला माल विक्री करावा लागत आहे. जर शासनाने शेतकऱ्यांचा माल घेण्यास नकार दिला, तर त्या शेतकऱ्यांना आपला माल एक हजार ते दीड हजार रुपये कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री करावा लागेल.

कोट..

राज्य शासनाचे धोरण एकदम चुकीचे आहे, एकीकडे लग्नाचे आमंत्रण शासनाकडून दिले जाते आणि दुसरीकडे लग्नात जेवण मिळेल की नाही, याबाबत कोणतीही शास्त्रीय माहिती दिली जात नसल्याचे या पत्रावरून दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याचा माल हा शासनाने खरेदी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा माल नोंदणी करूनदेखील खरेदी नाही करण्यात आला, तर शेतकऱ्यांच्या संतापला सामोरे जावे लागेल.

-किशोर चौधरी, प्रगतिशील शेतकरी, असोदा

गेल्या वर्षीदेखील मका खरेदीच्या वेळेस शेतकऱ्यांची नोंदणी करूनदेखील त्यांचा माल खरेदी करण्यात आला नव्हता, तसेच यावर्षीदेखील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याबाबत शासन स्पष्ट भूमिका घेताना दिसून येत नाही. जर नोंदणी करूनदेखील शेतकऱ्याचा माल खरेदी केला जात नसेल, तर शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचा उद्देश काय?

-ॲड. हर्षल चौधरी, पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी