शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

बदलीच्या प्रकारावरून शिक्षकांमध्ये संताप

By admin | Updated: April 13, 2017 00:32 IST

चोपडा : शासकीय निर्णयाबाबत शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शनाचा अभाव

चोपडा : पंचायत  समितीच्या  शिक्षण विभागामार्फत बदल्यांबाबत १२ एप्रिल शेवटचा दिवस होता. मात्र शासनाचे परिपत्रक एकाही प्राथमिक शाळेकडे  न पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गटशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिक यांनी मार्गदर्शन न केल्यामुळे आज अचानक विनंती अर्ज देण्यासाठी शेवटचा दिवस असल्याचा निरोप पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. प्राथमिक शिक्षकांना एकाच तालुक्यात २० वर्षे नोकरीला झाले असतील अशा शिक्षकांच्या बदल्या जिल्ह्यातच; परंतु बाहेर तालुक्यात केल्या जातात. मे महिन्यात या बदल्या होत असतात. मात्र यंदा शासनाने  बदल्यांबाबत २७ फेब्रुवारी २०१७ रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानिहाय बदल्या होणार आहेत. मात्र हे परिपत्रकच शिक्षण विभागामार्फत शाळेकडे पाठविले नाही. मार्गदर्शन कोणीही केले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे.तसेच आता नेहमीप्रमाणे आदिवासी आणि बिगर आदिवासी असे क्षेत्र न ठेवता अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा यासारखे दहा निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्राची गावे घोषित करणे, शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे, शिक्षकांच्या याद्या प्रकाशित करणे, शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे यासारखी कामे झालेलीच नाही.  अनेक गोष्टींबद्दल संभ्रम असल्याने  शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात  शिक्षक जमले होते.  राष्ट्रवादीचे शिक्षक तालुकाध्यक्ष सतीश बोरसे यांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. नाराजी व्यक्त करणाºया शिक्षकांमध्ये  सतीश बोरसे, नामदेव कोळी, विलास पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील, उज्ज्वल पाटील, धनराज पाटील, अमृत पाटील, भीमसिंग राजपूत आदींचा समावेश आहे.  सदर शासन निर्णय केंद्राप्रमुखांमार्फत सर्व शांळामध्ये पाठविला आहे. परिपत्रक समजायलाही एकदम स्पष्ट आणि सोपे आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व कार्यवाही केली आहे.                -एस.सी.पवार, गटशिक्षणाधिकारी, चोपडा