शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

बदलीच्या प्रकारावरून शिक्षकांमध्ये संताप

By admin | Updated: April 13, 2017 00:32 IST

चोपडा : शासकीय निर्णयाबाबत शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शनाचा अभाव

चोपडा : पंचायत  समितीच्या  शिक्षण विभागामार्फत बदल्यांबाबत १२ एप्रिल शेवटचा दिवस होता. मात्र शासनाचे परिपत्रक एकाही प्राथमिक शाळेकडे  न पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गटशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिक यांनी मार्गदर्शन न केल्यामुळे आज अचानक विनंती अर्ज देण्यासाठी शेवटचा दिवस असल्याचा निरोप पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. प्राथमिक शिक्षकांना एकाच तालुक्यात २० वर्षे नोकरीला झाले असतील अशा शिक्षकांच्या बदल्या जिल्ह्यातच; परंतु बाहेर तालुक्यात केल्या जातात. मे महिन्यात या बदल्या होत असतात. मात्र यंदा शासनाने  बदल्यांबाबत २७ फेब्रुवारी २०१७ रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानिहाय बदल्या होणार आहेत. मात्र हे परिपत्रकच शिक्षण विभागामार्फत शाळेकडे पाठविले नाही. मार्गदर्शन कोणीही केले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे.तसेच आता नेहमीप्रमाणे आदिवासी आणि बिगर आदिवासी असे क्षेत्र न ठेवता अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा यासारखे दहा निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्राची गावे घोषित करणे, शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे, शिक्षकांच्या याद्या प्रकाशित करणे, शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे यासारखी कामे झालेलीच नाही.  अनेक गोष्टींबद्दल संभ्रम असल्याने  शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात  शिक्षक जमले होते.  राष्ट्रवादीचे शिक्षक तालुकाध्यक्ष सतीश बोरसे यांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. नाराजी व्यक्त करणाºया शिक्षकांमध्ये  सतीश बोरसे, नामदेव कोळी, विलास पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील, उज्ज्वल पाटील, धनराज पाटील, अमृत पाटील, भीमसिंग राजपूत आदींचा समावेश आहे.  सदर शासन निर्णय केंद्राप्रमुखांमार्फत सर्व शांळामध्ये पाठविला आहे. परिपत्रक समजायलाही एकदम स्पष्ट आणि सोपे आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व कार्यवाही केली आहे.                -एस.सी.पवार, गटशिक्षणाधिकारी, चोपडा