शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारी समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 15:46 IST

बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत  प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.

ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथराव खडसे बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशानात देशभरातून एकत्र झाले समाज बांधवरुपलालजी महाराज यांना राष्टसंताचा दर्जा द्या 

 

जळगाव - बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत  प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.

रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यावर सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे अखिल भारतीय बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री रामदास बोडके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी, नाळ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे, बारी समाजाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अनुप बारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुपलालजी महाराज यांना राष्टÑसंताचा दर्जा द्या १. एकनाथराव खडसे म्हणाले , बारी समाज संपूर्ण भारतात अनेक पोटजातींमध्ये विखुरला आहे. या समाजाचे देशासाठी मोठे योगदान आहे. तसेच रुपलालजी महाराज यांनी देखील समाजासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले असून, शासनाने रुपलालजी महाराज यांना राष्टÑसंताचा दर्जा देण्याची गरज आहे. यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात येईल. तसेच मुख्यमंत्र्यांसह शासनाच्या कोणत्याही मंत्र्यांशी याबाबत बोलून निर्णय घेण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. २. बारी समाज देशभरात बरई, तांबोळी, चौरसिया, कुमरावत अशा पोटजातींमध्ये विखुरला आहे. समाज जरी मोठा असला तरी अजून देखील समाज एकत्र झालेला नाही. त्यामुळे समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच पोटजातींमध्ये ‘रोटी-बेटी’ व्यवहार देखील व्हावा यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असेही एकनाथराव खडसे म्हणाले. 

‘एक बारी, सब पे भारी’ बारी समाजाने प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून, ‘एक बारी, सब पे भारी’ हे वाक्य सार्थ ठरवले असल्याचेही खडसे यांनी सांगितले. समाजातील युवक देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवत असून, समाजातील मुलींनी देखील आता पुढे येण्याची गरज असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिवेशनाचे कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी केले.