शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

विमा तक्रारींचे निवारण करा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात केळी आणि कापसाच्या पीकविम्यासंदर्भात १५३ शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात केळी आणि कापसाच्या पीकविम्यासंदर्भात १५३ शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पीकविमा कंपनीचे राज्यस्तरावरील अधिकारीच अनुपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकारी राऊत यांनी कंपनीला आता ८ डिसेंबरची मुदत दिली आहे. या कालावधीत तक्रारींचे निवारण न झाल्यास कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचा तसेच प्रसंगी गुन्हेदेखील दाखल करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला. या बैठकीला कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते.

मागील कालावधीत जिल्ह्यातील १५३ शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची रक्कम मिळाली नव्हती. त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला या आधीच दिले होते. मात्र आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कंपनीचे राज्यस्तरावरील अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहिले. तसेच त्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.