शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

विमा तक्रारींचे निवारण करा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात केळी आणि कापसाच्या पीकविम्यासंदर्भात १५३ शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात केळी आणि कापसाच्या पीकविम्यासंदर्भात १५३ शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पीकविमा कंपनीचे राज्यस्तरावरील अधिकारीच अनुपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकारी राऊत यांनी कंपनीला आता ८ डिसेंबरची मुदत दिली आहे. या कालावधीत तक्रारींचे निवारण न झाल्यास कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचा तसेच प्रसंगी गुन्हेदेखील दाखल करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला. या बैठकीला कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते.

मागील कालावधीत जिल्ह्यातील १५३ शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची रक्कम मिळाली नव्हती. त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला या आधीच दिले होते. मात्र आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कंपनीचे राज्यस्तरावरील अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहिले. तसेच त्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.