शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विमा तक्रारींचे निवारण करा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात केळी आणि कापसाच्या पीकविम्यासंदर्भात १५३ शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात केळी आणि कापसाच्या पीकविम्यासंदर्भात १५३ शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पीकविमा कंपनीचे राज्यस्तरावरील अधिकारीच अनुपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकारी राऊत यांनी कंपनीला आता ८ डिसेंबरची मुदत दिली आहे. या कालावधीत तक्रारींचे निवारण न झाल्यास कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचा तसेच प्रसंगी गुन्हेदेखील दाखल करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला. या बैठकीला कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते.

मागील कालावधीत जिल्ह्यातील १५३ शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची रक्कम मिळाली नव्हती. त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला या आधीच दिले होते. मात्र आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कंपनीचे राज्यस्तरावरील अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहिले. तसेच त्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.