शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तीन दिवसात बिलाची वसुली करा,अन्यथा वीज पुरवठा खंडित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:19 IST

जळगाव : घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा आकडा वाढला आहे. येत्या तीन दिवसात जळगाव परिमंडळातील ...

जळगाव : घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा आकडा वाढला आहे. येत्या तीन दिवसात जळगाव परिमंडळातील सर्व लहान- मोठे औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करण्याचा प्रयत्न करा, जे थकबाकीदार वीजबिल भरणार नाहीत. अशा ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करा,असे आदेश महावितरणचे सर व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी जळगावातील मुख्य कार्यालयाती बैठकीत दिले. तसेच यावेळी त्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही या बैठकीत दिल्या.

कोरोनामुळे यंदा शासनाच्या सुचनेनुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता महावितरणने ग्राहकांना मार्च ते जुन पर्यंत सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणने दिलेले सरासरी बिल हे जादा असल्याच्या तक्रारी करित, अनेक ग्राहकांनी गेल्या वर्षी जूनपासून वीजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह एकूण साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहचला आहे. या वसुलीसाठी महावितरणतर्फे थकबाकीदारांविरोधात कारवाई मोहिमही सुरू आहे. मात्र, २८ फेब्रुवारी पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी जळगावी येऊन सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर,उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार उपस्थित होते. यावेळी बोडके यांनी जिल्हानिहाय थकबाकीची माहिती घेऊन, आता पर्यंत झालेल्या वसुलीची माहिती घेतली. यानंतर बोडके यांनी मागील १० महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी १०० टक्के वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नसल्याचेही बोडके यांनी सांगितले.

इन्फो :

वीजमीटरही काढुन आणण्याच्या सुचना

या बैठकीत बोडके यांनी ज्या ग्राहकांनी लॉकडाऊपासून वीजबिलच भरलेले नाही, अशा थकबाकीदार ग्राहकांना थेट वीज पुरवठा खंडित करुन, घरात वीजमीटरही न ठेवता काढुन आणण्याच्या सुचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही केले.