शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तीन दिवसात बिलाची वसुली करा,अन्यथा वीज पुरवठा खंडित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:19 IST

जळगाव : घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा आकडा वाढला आहे. येत्या तीन दिवसात जळगाव परिमंडळातील ...

जळगाव : घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा आकडा वाढला आहे. येत्या तीन दिवसात जळगाव परिमंडळातील सर्व लहान- मोठे औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करण्याचा प्रयत्न करा, जे थकबाकीदार वीजबिल भरणार नाहीत. अशा ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करा,असे आदेश महावितरणचे सर व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी जळगावातील मुख्य कार्यालयाती बैठकीत दिले. तसेच यावेळी त्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही या बैठकीत दिल्या.

कोरोनामुळे यंदा शासनाच्या सुचनेनुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता महावितरणने ग्राहकांना मार्च ते जुन पर्यंत सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणने दिलेले सरासरी बिल हे जादा असल्याच्या तक्रारी करित, अनेक ग्राहकांनी गेल्या वर्षी जूनपासून वीजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह एकूण साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहचला आहे. या वसुलीसाठी महावितरणतर्फे थकबाकीदारांविरोधात कारवाई मोहिमही सुरू आहे. मात्र, २८ फेब्रुवारी पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी जळगावी येऊन सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर,उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार उपस्थित होते. यावेळी बोडके यांनी जिल्हानिहाय थकबाकीची माहिती घेऊन, आता पर्यंत झालेल्या वसुलीची माहिती घेतली. यानंतर बोडके यांनी मागील १० महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी १०० टक्के वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नसल्याचेही बोडके यांनी सांगितले.

इन्फो :

वीजमीटरही काढुन आणण्याच्या सुचना

या बैठकीत बोडके यांनी ज्या ग्राहकांनी लॉकडाऊपासून वीजबिलच भरलेले नाही, अशा थकबाकीदार ग्राहकांना थेट वीज पुरवठा खंडित करुन, घरात वीजमीटरही न ठेवता काढुन आणण्याच्या सुचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही केले.