शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

भाजपच्या गटनेतेपदावरून बंडखोर व नगरसेवक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदावरून भाजपचे शिल्लक नगरसेवक व बंडखोर नगरसेवक आमने-सामने आले आहेत. बंडखोरांकडून भाजप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदावरून भाजपचे शिल्लक नगरसेवक व बंडखोर नगरसेवक आमने-सामने आले आहेत. बंडखोरांकडून भाजप गटनेतेपदावर दावा केला जात असून, त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, त्याआधीच भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी विभागीय आयुक्त, महापौर व मनपा आयुक्तांना निवेदन देऊन बंडखोरांचा गटनेतेपदासाठीचा प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मध्यंतरी अपात्रतेच्या प्रस्तावावरून बंडखोर व भाजप नगरसेवकांमधील महाभारत गाजल्यानंतर आता गटनेतेपदावरून हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

काय आहे प्रकरण?

१. महापालिकेत भाजपचे एकूण ५७ नगरसेवक होते. त्यात महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपविरोधात थेट बंड पुकारून २७ नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर अजून ३ नगरसेवकांनी भाजप सोडून शिवबंधन बांधले. त्यामुळे बंडखोरीनंतर भाजपकडे ५७ पैकी २७ नगरसेवक शिल्लक आहेत.

२. तर बंडखोरांच्या गटात ३० नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली असली तरी अजूनही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे अजूनही हे नगरसेवक भाजपचेच नगरसेवक आहेत. बंडखोरांकडे पक्षाचे अधिक नगरसेवक असल्याने भाजपचे गटनेतेपद बंडखोरांना मिळावे यासाठी बंडखोरांकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याचा हालचाली सुरू आहेत.

३. दुसरीकडे भाजप मात्र गटनेतेपद कायम राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. येणाऱ्या काळात आता हे पद कोणाकडे जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

..तर भाजपकडे एकही पद राहणे होईल कठीण

महापालिकेत सत्तेसोबतच भाजपचे अनेक पदेदेखील जात आहेत. सत्ता गमाविल्यानंतर महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून भाजपच शाबूत होता. मात्र, हे पद देखील सत्तेत असूनही शिवसेनेकडेच आहे. भाजपचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनीही बंड पुकारल्याने ते पददेखील भाजपकडे नाही. आता गटनेतेपददेखील गमाविल्यास भाजपकडे कोणतेही पद भविष्यात शिल्लक राहण्याची शक्यता नाही. स्थायी समिती सभापतीपद हे भाजपकडे असले तरी मात्र येणाऱ्या निवडणुकीत हे पददेखील भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.

बंडखोरांच्या त्या प्रस्तावावर गटनेत्यांनी घेतली हरकत

बंडखोर नगरसेवकांकडून भाजपच्या गटनेतेपदावर दावा केला जात असून, यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने हा प्रस्ताव दाखल होण्याआधीच या प्रस्तावावर हरकत घेतली आहे. भाजप गटनेते भगत बालानी यांनी विभागीय आयुक्त, महापौर व मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे काही सदस्य दुसरी आघाडीची नोंदणी करण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र,त्यांच्याविरोधात आधीच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने अपात्रतेचा प्रस्ताव दाखल झाला असल्याने त्यांच्या प्रस्तावावर कोणताही विचार करण्यात येऊ नये, अशी मागणी गटनेत्यांनी केली आहे.