शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

विद्रोही मात्र चिंतनीय कवितांनी केले सर्वांना अंतर्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ऑनलाईन कविसंमेलनात सोमवारी सादर झालेल्या विद्रोही मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ऑनलाईन कविसंमेलनात सोमवारी सादर झालेल्या विद्रोही मात्र चिंतनीय कवितांनी सर्वांना अंतर्मुख केले.

विद्यापीठातील फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, विचारधारा प्रशाळेअंतर्गत बुद्धिस्ट अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, महात्मा जोतिबा फुले अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मागासवर्गीय कर्मचारी संघटना (क.ब.चौ.उ.म.वि.) यांच्या संयुक्तपणे ११ ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करीत आहेत. सोमवारी विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कविसंमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे होत्या तर या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून गझलकार मुकुंद राजपंखे, ख्वाडा, बबन चित्रपटाचे गीतकार कवी विनायक पवार, कवी सुदाम राठोड, कवी सुनील उबाळे यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले. कविसंमेलनाची सुरुवात कवी सुनील उबाळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितेने सुरुवात केली.

या विद्रोही कविसंमेलनात प्रा. म. सु. पगारे यांनी आपली महात्मा फुले यांच्या जीवन व कार्याचा वैचारिक आशय व्यक्त करणाऱ्या क्रांतिबा कवितेचे सादरीकरण केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन व परिचय दीपक खरात यांनी केले तर दीपक सोनवणे यांनी आभार मानले.

चांदण्याची छाया, कापराची काया...

दुपारी २ वाजता शाहीर चरण जाधव यांच्या शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर चरण जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात बासरीवादन करून केली. सुरुवात वामनदादा कर्डक यांचे ‘चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया’ या गीताने केली. शाहीर प्रताप सिंग बोदडे यांचे ‘दोनच राजे इथे गाजले, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर’ हे गीत सादर केले. सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार कृष्णा संदनशिव यांनी मानले.