शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगरातील संच वीजनिर्मितीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:49 IST

राज्यातील विजेची मागणी वाढली : केंद्राकडून (एनटीपीसी) आठ हजार 213 मेगाव्ॉट विजेची खरेदी

भुसावळ : महाजेनकोच्या  दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील विजेच्या मागणीअभावी बंद असलेले 210 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीजनिर्मितीसाठी सज्ज असल्याची स्थिती आहे. दरम्यान, महावीजनिर्मितीकडून आदेश आल्यावर ते तत्काळ कार्यान्वित करण्यात येतील, असे दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेची मागणी वाढली आहे. गुरुवारी राज्याची विजेची मागणी तब्बल 20 हजार 912 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती देण्यात आली. महानिर्मितीची वीजनिर्मितीशासनाच्या महावीजनिर्मितीची शुक्रवारी 7 हजार 976 मेगाव्ॉट इतकी वीजनिर्मिती होती. यात खाजगी उद्योगांची  तीन हजार 408 आणि केंद्राची (एनटीपीसी)  आठ हजार 213 मेगाव्ॉट अशी वीज वापरून महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण करण्यात आली़स्थानिक संच कार्यान्वित करादीपनगरातील स्थानिक बंद करण्यात आलेले 210 मेगाव्ॉटचे दोन्ही संच कार्यान्वित केल्यास केंद्राकडून महागडी तीन रुपये 24 पैसे युनिट नुसार वीज घेण्याची गरज भासणार नाही. यासाठी येथील बंद संच तातडीने सुरू करण्याची गरज निर्माण झाली.महानिर्मितीची वीज स्वस्तशासनाच्या महावीजनिर्मितीची वीज केंद्र आणि खाजगी उद्योगांपेक्षा स्वस्त आहे. ती दोन रुपये 91 पैसे युनिट या दराने उपलब्ध असताना आपण एनटीपीसीची वीज तीन रुपये 24 पैसे युनिट या दराने खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.वहन होताना नुकसानदरम्यान, एनटीपीसीची वीज घेताना व तिचे वहन होताना सुमारे 30 ते 35 टक्के विजेचे नुकसान होत असल्याची  जाणकारांची माहिती आहे.स्थापित क्षमतामहावीजनिर्मितीची दररोजची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता 11 हजार 500 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाराष्ट्रातील महाजेनकोची सात वीजनिर्मिती केंद्र आणि जल, वायू आणि सौर ऊज्रेवरील सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरू राहिल्यास महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीची 11 हजार 500 मेगाव्ॉट वीजनिर्मिती होऊ शकते मात्र यासाठी सर्व संच सुरू असणे गरजेचे आहे. दरम्यान, संच सुरू कधी होतात याकडे लक्ष लागून आह़ेमुबलक पाण्याची सोय4दीपनगर वीजनिर्मिती केंद्रच मुळात तापी नदीच्या काठावर वसले आहे. पाण्याचा अहोरात्र स्त्रोत आहे. दीपनगरचा स्वत:चा बंधारा आहे शिवाय हे केंद्र आशिया महामार्गावर आहे. निवासांची सोय आहे. पुरेशा प्रमाणात कोळसा आहे. वीज केंद्रार्पयत रेल्वे लाईनचे जाळे आहे आणि विजेची मागणी आह़े असे असताना वीजनिर्मिती संच बंद ठेवू नये, अशी भावना या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वीज संच बंद असल्याने  रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, अशीही कामगारांची भावना आहे. दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पावर सुमारे पाच हजार कुटुंबीयांचा चरितार्थ  आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी आहे.