शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विविध स्पर्धातील सहभागाने वाचन, लेखन झाले समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:59 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत प्रा.डॉ.शकुंतला चव्हाण.

शालेय जीवनापासूनच वाचन लेखनाची प्रेरणा मिळाली. घरात शैक्षणिक वातावरण होते. शाळेतील वाचनालयातून पुस्तके, मासिके, काव्यकथा, कादंबरी व विविध साहित्य वाचायला आवडायचे. पुढे औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना विविध स्पर्धामध्ये भाग घेत असे. त्यातून वाचन, लेखन, वक्तृत्व समृद्ध होत गेले. महाविद्यालयातील ‘नवरंग’ वार्षिक अंकासाठी लिखाण केले. हजारो विद्याथ्र्यामधून सवरेत्कृष्ट लेखनाचा बहुमान मिळाला व नवरंग मासिकासाठी विद्यार्थी प्रमुख संपादिका म्हणून निवड झाली. महाविद्यालय खरं तर विद्याथ्र्यासाठी पहिले व्यासपीठ असतं. जिथून विद्यार्थी घडत जातो. मला घडविण्यात कॉलेज व विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. याच ठिकाणी कलाकार, शास्त्रज्ञ यांच्या व्याख्यानांचा, त्याचा अनुभवाचा लाभ घेता आला. सर्वप्रथम माङया कवितेची सुरुवात कॉलेजमधील मासिक, भित्तीपत्रिका यामधून झाली. शिकत असताना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृतमधील पुस्तकातील कवितेशी पहिली ओळख झाली. मैत्री झाली. ती मैत्री इतकी तनामनात भिनली की माङया जगण्याचा एक भाग झाली. कविता करणे म्हणजे कविता होणे असते. त्यासाठी प्रतिभा लागते म्हणूनच म्हटलं जातं. (पोयट आर बॉर्न नॉट टू मेड) कवी जन्म घेतात, निर्माण केले जात नाहीत. कवीची अनुभूती आणि अभिव्यक्ती कवितेला समृद्ध करत असते. माझा साहित्य संपदेत एकूण 14 पुस्तके आहेत. त्यात मराठी, हिंदी, अहिराणी कविता संग्रह, समीक्षात्मक पुस्तके, ललित, वैचारिक साहित्य, स्त्रीवादी साहित्य, लोकसाहित्य, तुलनात्मक साहित्य, मीडिया लेखन आदी पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक कविताना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, तर अखिल भारतीय स्तरावर हिंदी कवितांनी थेट ‘इक्कीसवी सदी के हिंदी श्रेष्ठ कवि एवं कवयित्रीयाँ’ पुस्तकाच्या माध्यमातून जगाशी नातं जोडलं. श्रेष्ठ काळजालाच हात घातला. जीवनातील वास्तवाला धीटपणे कवेत घेणारी निर्भय कविता वाचकांना झपाटून टोकल्याशिवाय राहत नाही.