शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

रावेर तालुक्यात १० तर अमळनेरमध्ये ११ गावे संवेदनशील

By admin | Updated: February 11, 2017 00:19 IST

जि़प़ व पं़स़ निवडणुक : अमळनेरात जिल्हाधिकाºयांची पोलीस अधिक्षकांसह भेट

रावेर/अमळनेर : तालुक्यातील १० गावांमधील ४४ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे निवडणूक यंत्रणेने घोषीत केले आहे. अशा गावांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मुंबई पोलीस अधिनियम १४९ अन्वये नोटीस बजावून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अमळनेर येथे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी भेट देवून तडीपारचे प्रस्ताव निकाली काढून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले़  रावेर तालुक्यात मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या कक्षेपलीकडे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राखून व्हीडीओ चित्रणाद्वारे संवेदनशील केंद्रावर सुक्ष्मनजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, नायब तहसीलदार उमाकांत कडनौर यांनी दिली.जि.पं.-पं.स. निवडणुकीसाठी   २०७ मतदान केंद्र आहेत. त्यातील १० केंद्र संवेदनशील असल्याचा संयुक्त अहवाल फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यात रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत अहिरवाडी (तीन मतदान केंद्र), रसलपूर (पाच मतदान केंद्र), वाघोड (तीन मतदान केंद्र), खिरवड (दोन मतदान केंद्र), अजंदा (दोन मतदान केंद्र), पाल (चार मतदान केंद्र) अशी सहा गावांमधील १९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. सावदा पोलीस स्टेशनअंतर्गत चिनावल (नऊ मतदान केंद्र) व वाघोदा बु.।। (सात मतदान केंद्र) असे १६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत तर निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत विवरे बु.।। (६ मतदान केंद्र) तर खिर्डी बु.।। येथील (३ मतदान केंद्र) असे नऊ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. १२ रोजी मतदान यंत्रांची                सेटींग व सिलिंग रावेर तहसील कार्यालयातंर्गत असलेल्या खुल्या जागेत शामीयाना उभारण्यात आला आहे. रविवार, १२ रोजी २०७ मतदान केंद्रावरील मतदान यंत्राचे मतदान पत्रिकेसह सेटींग व सिलिंग करण्यात येणार आहे. त्याकरीता २५ टेबलवर प्रत्येकी सात कर्मचाºयांद्वारे ही प्रक्रिया पार पडणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. जि.पं.-पं.स. उमेदवार वा उमेदवार प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती नायब तहसिलदार उमाकांत कडनौर यांनी दिली.           (वार्ताहर)अमळनेर तालुक्यातील  संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रीत ठेवा, तसेच तडीपारचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढा अशा सूचना जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी आज अधिकाºयांना दिल्या.४जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी प्रांत कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, सां.बा.चे.उपविभागीय कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, पोलीस निरीक्षक विकास वाघ, मारवडचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहायक गटविकास अधिकारी बी.डी.गोसावी, कृषी अधिकारी बी.जी.पाटील हजर होते. ४अमळनेर पोलीस स्टेशनअंतर्गत जानवे, शिरूड, पिळोदा, पातोंडा, दहीवद, मठगव्हाण तर मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत अमळगाव, मांडळ, खापरखेडा, वासरे, कळमसरे ही ११ गावे संवेदनशील असून, या गावांकडे प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी लक्ष ठेवावे असेही यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले.४बैठकीनंतर अधिकाºयांनी मतदानपेट्या ठेवण्यात येणाºया इंदिरा भवनची पहाणी केली.