शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पाळधी शिवारात विजेच्या खांबांनी केला ‘रास्तारोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 17:01 IST

पाळधी, ता. जामनेर : सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात पाळधी शिवारात उन्मळून पडलेले विजेचे खांब अजूनही तशाच अवस्थेत ...

पाळधी, ता. जामनेर : सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात पाळधी शिवारात उन्मळून पडलेले विजेचे खांब अजूनही तशाच अवस्थेत आहे. हे खांब पुन्हा उभारण्याचे सोडून केवळ वीज पुरवठा खंडीत करुन संबंधित अधिकारी मोकळे झाले आहेत. यामुळे मात्र शेतात ये- जा करण्यास अडसर निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.याबाबत वृत्त असे की, पहूर सबस्टेशन वरून तीन वर्षांपूर्वी पिंपळगाव गोलाईत येथील सबस्टेशनला पाळधी मार्गे नवीन विजेचे खांब टाकून वीज पुरवठा करण्यात आला. परंतु मागील तीन वर्षात चार वेळेस या वीज पुरवठयाचे खांब पडले तसेच मागील वर्षी या विजेच्या तारा सुद्धा चोरी गेल्याची घटना घडली होती.आता पुन्हा मागील दोन महिन्यांपासून काही खांब शेतकºयाच्या शेतात व शेत रस्त्यावर पडलेले असल्याने शेतकºयांना शेतात जाण्यासाठी तसेच खताने भरलेली बैलगाडी नेताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे.रस्ता काढतानाकरावी लागते कसरतबºयाच दिवसांपासून हे खांब पडल्याने तारा लोंबकळत आहेत व काही शेतकरी आपले बैल बाधण्यासाठी या तारांचा वापर करत आहेत. दुचाकी धारकांना सुद्धा ताराखालून गाडी काढावी लागत आहे.सुमारे ४० खांब पडलेपाळधी शिवार ते पिंपळगाव गोलाईत दरम्यान सहा किमी अंतरात जवळपास ४० ते ४५ खांब उन्मळून पडलेले आहेत.पहुर, पाळधी , सोनाळे, व पिंपळगाव या गावच्या शेतकºयांना दरवर्षी हे खांब पडण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दरवर्षी पडतात खांबआतापर्यंत प्रत्येक वर्षी तीन- चार वेळेस हे खांब पडलेले आहेत व उभेही केलेले आहेत. परंतु खांब उभे करून सुद्धा पुन्हा पुढील वर्षी ते पहिल्याच वादळात पडतात यावरून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात येतो. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे खांब सुस्थितीत आहेत, येथेच असे का होते हे गोडंबंगाल असल्याचे बोलले जात आहे. तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांना होणारा अडथळा व त्रास कायमस्वरूपी दूर करावा अशी मागणी होत आहे.