शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

भुसावळला नागरीप्रश्न रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 21:54 IST

तहसीलदार आंदोलनस्थळी आल्यावर मागे घेतले आंदोलन

भुसावळ : शहरातील रस्त्यांची कामे सात दिवसात पूर्ण करण्यात यावी, अमृत योजनेची चौकशी करून दोषींच्या संपत्तीवर बोजा टाकण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील बेघरांना घरे देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनाधार पार्टी व महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून यावल रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल ४३ मिनिटे हे आंदोलन सुरू होते. यादरम्यान या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.तहसीलदार दीपक धिवरे यांनी विविध १३ मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. जे रस्ते बनवले त्यात डांबर कमी व रॉकेल जास्त वापरल्यामुळे ते रस्तेही उखडले आहे. तर अमृत योजनेचे कामही उलट्या दिशेने सुरू करण्यात आले आहे. प्रथम पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर टाक्यांचे काम सुरू झाले. त्यानंतर पाण्याचा उद्भव शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. खरे तर प्रथम पाण्याचा उद्भव शोधण्याची गरज होती. मात्र पाईपात मिळणाऱ्या कमिशनसाठी उलट्या दिशेने काम सुरू झाले असल्याचा आरोप माजी आमदार चौधरी यांनी आंदोलनस्थळी बोलताना केला आहे. तरी या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या संपत्तीवर बोजा टाकून पैसे वसूल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनामध्ये माजी आमदार चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, माजी नगरसेवक ललित मराठे, भीमा कोळी, नगरसेवक शेख मुस्ताक शेख मुसा, सलीम पिंजारी, साजिद शेख, नगरसेवक जाकीर सरदार सिकंदर खान, अशोक चौधरी, माजी नगरसेवक आशिक खान शेर खान, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे मुन्ना सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, संजय खडसे, संतोष साळवे, विलास खरात, अ‍ॅड. प्रमोद चव्हाण , सूनील दांडगे, शैलेश अहिरे, वनिता खरारे, रेखा सोनवणे, राणी खरात, सिद्धार्थ सोनवणे, सलीम कुरेशी यांच्यासह शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नेमाडे, तालुकाध्यक्ष मराठे, ललित मराठे, गटनेते पगारे आदींनीही मनोगत व्यक्त केले.अशा आहे इतर मागण्यारेल्वे प्रशासनाने उत्तर भारतातील गरीब लोकांची घरे कोच फॅक्टरी बनवण्याच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र या जागेवर कोणतीही कोच फॅक्टरी होत नसल्यामुळे याच जागेवर बेघर वासियांना हक्काची घरे बांधून देण्यात यावी व दुकानदारांना पुन्हा दुकाने बांधून देण्यात यावे., शहरात पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ही पाणीटंचाई दूर करावी, डेंग्यूमुळे शहरातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये नगरपालिकेकडून मदत करण्यात यावी व आरोग्य विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मुख्याधिकारी रजेवर असताना प्रभारी मुख्याधिकारी बबनराव तडवी यांच्या नियुक्ती दरम्यान पदाचा गैरवापर करून ठेकेदारांची दोन कोटी रुपयांचे बिले मंजूर करण्यात आली आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.