शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

शहरातील घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे : व्यवस्थापनाचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

तीन-तीन दिवस करावी लागते घंटागाड्यांची प्रतीक्षा : दररोज निघणारा कचरा - २७० टन मनपाच्या घंटागाड्या - ८५ लोकमत न्यूज ...

तीन-तीन दिवस करावी लागते घंटागाड्यांची प्रतीक्षा :

दररोज निघणारा कचरा - २७० टन

मनपाच्या घंटागाड्या - ८५

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील दैनंदिन सफाईचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून सुरू आहे. मात्र, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न वॉटरग्रेस कंपनीला अद्यापही सोडविता आलेला नाही. अजूनही शहरातील अनेक भागांत तीन-तीन दिवस घंटागाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे असून यामुळे व्यवस्थापनाचा पूर्णपणे कचरा झाल्याचे दिसून येत आहे.

मनपाकडून वॉटरग्रेसला मक्ता दिल्यापासून हा मक्ता अस्वच्छता, कचऱ्याचे वजन वाढविणे, घंटागाड्या नियमितपणे न येणे अशा समस्यांमुळे गाजला आहे. गेल्या आठ दिवसांपासून अनेक कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे अनेक भागांत घंटागाड्या पोहोचू शकत नाहीत. चार दिवसांपासून घंटागाडी न आल्याने ठिकठिकाणी शहरात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत.

जीपीएस प्रणाली कार्यान्वित

१. घंटागाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने जीपीएस प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. मात्र, या यंत्रणेचा फायदा होताना दिसून येत नाही. अनेक भागांत घंटागाड्याच पोहोचत नाहीत.

२. घंटागाडी चालकांनीच काम बंद आंदोलन पुकारल्याने घंटागाड्यांना चालकच नसल्याने बऱ्याच गाड्या पडून असतात. त्यामुळे जीपीएस प्रणालीचा लाभदेखील होत नाही.

जमा केलेल्या कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही

शहरातून दररोज सरासरी २७० टन कचरा जमा होत असून, महिन्याला सुमारे ७ हजार टनपर्यंत कचरा आव्हाणे भागातील मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जातो. मात्र, सात वर्षांपासून हा प्रकल्प बंदच असल्याने कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होतच नाही.

कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी मनपाने ४ कोटी रुपयांचा मक्ता दिला आहे. मात्र, मक्तेदाराकडूनही तोकडेच काम केले जात आहे. यामुळे कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे.

कोट..

प्रत्येक भागात घंटागाड्या या वेळेवर जात आहेत. गेल्या आठवड्यात काही कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. यामुळे काही भागात घंटागाड्या पोहोचू शकल्या नाहीत. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू झाल्यामुळे पुन्हा घंटागाड्या नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच जीपीएस प्रणालीद्वारे घंटागाड्यांची स्थितीदेखील तपासली जाते.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा