शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

शहरातील घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे : व्यवस्थापनाचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

तीन-तीन दिवस करावी लागते घंटागाड्यांची प्रतीक्षा : दररोज निघणारा कचरा - २७० टन मनपाच्या घंटागाड्या - ८५ लोकमत न्यूज ...

तीन-तीन दिवस करावी लागते घंटागाड्यांची प्रतीक्षा :

दररोज निघणारा कचरा - २७० टन

मनपाच्या घंटागाड्या - ८५

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील दैनंदिन सफाईचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून सुरू आहे. मात्र, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न वॉटरग्रेस कंपनीला अद्यापही सोडविता आलेला नाही. अजूनही शहरातील अनेक भागांत तीन-तीन दिवस घंटागाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे असून यामुळे व्यवस्थापनाचा पूर्णपणे कचरा झाल्याचे दिसून येत आहे.

मनपाकडून वॉटरग्रेसला मक्ता दिल्यापासून हा मक्ता अस्वच्छता, कचऱ्याचे वजन वाढविणे, घंटागाड्या नियमितपणे न येणे अशा समस्यांमुळे गाजला आहे. गेल्या आठ दिवसांपासून अनेक कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे अनेक भागांत घंटागाड्या पोहोचू शकत नाहीत. चार दिवसांपासून घंटागाडी न आल्याने ठिकठिकाणी शहरात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत.

जीपीएस प्रणाली कार्यान्वित

१. घंटागाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने जीपीएस प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. मात्र, या यंत्रणेचा फायदा होताना दिसून येत नाही. अनेक भागांत घंटागाड्याच पोहोचत नाहीत.

२. घंटागाडी चालकांनीच काम बंद आंदोलन पुकारल्याने घंटागाड्यांना चालकच नसल्याने बऱ्याच गाड्या पडून असतात. त्यामुळे जीपीएस प्रणालीचा लाभदेखील होत नाही.

जमा केलेल्या कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही

शहरातून दररोज सरासरी २७० टन कचरा जमा होत असून, महिन्याला सुमारे ७ हजार टनपर्यंत कचरा आव्हाणे भागातील मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जातो. मात्र, सात वर्षांपासून हा प्रकल्प बंदच असल्याने कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होतच नाही.

कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी मनपाने ४ कोटी रुपयांचा मक्ता दिला आहे. मात्र, मक्तेदाराकडूनही तोकडेच काम केले जात आहे. यामुळे कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे.

कोट..

प्रत्येक भागात घंटागाड्या या वेळेवर जात आहेत. गेल्या आठवड्यात काही कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. यामुळे काही भागात घंटागाड्या पोहोचू शकल्या नाहीत. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू झाल्यामुळे पुन्हा घंटागाड्या नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच जीपीएस प्रणालीद्वारे घंटागाड्यांची स्थितीदेखील तपासली जाते.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा