शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा जपताहेत राजीव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 16:06 IST

स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे.

ठळक मुद्देमैत्रीपूर्ण वृत्ती, सदैव सहकार्याची तयारी, सर्वांशी आदर व आपुलकीची वागणूक ही राजीव देशमुख यांची बलस्थाने आमदारकीच्या काळात एम.आय.डी.सी. ची मुहूर्तमेढ रोवली. गिरणा धरणातून चाळीसगाव शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करुन कार्यान्वीत केली.

चाळीसगाव ( संजय सोनार) नगरपालिकेतील सलग २७ वर्षे नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे, पश्चिम विकास महामंडळाचे अध्यक्ष यांसह अनेक पदे भूषविणारे लोकनेते स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे.स्व. नगराध्यक्ष रामरावदादा यांच्या निधनानंतर नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे पुत्र अनिलदादा यांच्याकडे जनतेने सोपविली. अनिलदादांनी राजकारणात सर्वांना एकत्रित आणून आपल्या कौशल्याने नगरपालीकेत सलगपणे २७ वर्षे नगराध्यक्षपद भूषवून महाराष्ट्रात नावलौकीक मिळविला होता. कुशल, धुरंधर व मुरब्बी राजकारणी अशी त्यांच्या कार्याची ओळख. याबरोबरच त्यांनी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन, वैधानिक महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष, आॅल इंडिया इन्स्टीट्युट आॅफ लोकल बोर्डाचे व्हा.चेअरमन, जिल्हा बँक संचालक या सह अनेक पदांवर कार्यरत होते. जातीय सलोखा कायम ठेवून चाळीसगाव शहरात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. यामुळेच त्यांची चाळीसगाव नगरीचे शिल्पकार म्हणून ओळख होती.अनिलदादा देशमुख यांचे २००१ मध्ये निधन झाले, त्यानंतर नगरसेवक म्हणून त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राजीव देशमुख यांच्या सार्वजनिक, सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात येथून झाली. तेव्हापासून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखविली. यानंतर झालेल्या न.पा. निवडणुकीतही ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले तर नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांच्या पत्नी पद्मजा देशमुख विजयी झाल्यात आणि पालिकेची सत्ता देशमुख परिवाराकडे आली.चाळीसगाव विधानसभा मतदार संघ ४० वर्षानंतर प्रथमच खुला झाल्यानंतर राजीव देशमुख यांना आमदारकीची संधी मिळाली. आमदारकीच्या या संधीने स्व. अनिल दादांची इच्छा पूर्ण झाली. आजोबा स्व. रामरावदादा व वडील स्व. अनिलदादा यांच्या पावलावर पाऊल ठेवीत राजीव देशमुख यांनीही राजकारणाबरोबरच सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक रुची जोपासली. वडील व आजोबांनी जोपासलेला वारसा ते मोठ्या दिमाखाने पुढे नेत आहे. कुटूंबाचे समाजकारण, राजकारणातील कामांची पध्दत त्याच दिशेने त्यांनी पुढे आणली. मैत्री पूर्ण वृत्ती, हसतमुख चेहरा, सदैव सहकार्याची तयारी, सर्वांशी आदर व आपुलकीची वागणूक ही त्यांची बलस्थाने आहेत.आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव एम.आय.डी.सी. ची मुहूर्तमेढ रोवली. गिरणा धरणातून चाळीसगाव शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करुन ती कार्यान्वीत केली. वरखेडे धरणाची सुरुवात ही त्यांच्याच काळात झाली. जिद्दीने आपला राजकीय व सामाजिक प्रवास सुरु ठेवला आहे, निष्ठा व संघटनेतील जबाबदारी पार पाडत आहे. 

टॅग्स :Politicsराजकारण