शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस उद्यापासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

जळगाव : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मार्चपासून बंद असलेली मुंबई ते दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस ३० डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार ...

जळगाव : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मार्चपासून बंद असलेली मुंबई ते दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस ३० डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही गाडी धावणार असून, रेल्वेतर्फे बुकिंगलाही सुरुवात करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षापासून दिल्लीला जाण्यासाठी खास मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सुरू केली आहे. कोरोनामुळे मात्र ही गाडी बंद होती. ३० डिसेंबरपासून ही गाडी पुन्हा धावणार असून, (गाडी क्रमांक ०१२२१) डाउन ही गाडी दर सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी व शनिवारी धावणार आहे. मुंबईहून दुपारी ४.१० वाजता निघून जळगावला रात्री सव्वानऊ वाजता पोहाेचणार आहे. तर, दिल्लीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे.

गाडी क्रमांक (०१२२२) अप ही गाडी दर मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी व रविवारी धावणार असून, दिल्ली येथून सायंकाळी ४.५५ वाजता सुटून, जळगावला सकाळी ६ वाजता पोहोचणार आहे.

इन्फो :

जळगावला थांबणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

रेल्वे प्रशासनातर्फे १ जानेवारी २०२१ पासून जळगाव स्थानकावर थांबा असलेल्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यामध्ये (गाडी क्रमांक ०२७१५) ही डाउन मार्गावरील नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही गाडी जळगावला पूर्वीप्रमाणे सायंकाळी पावणेसहा वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार सायंकाळी ६ वाजता येणार आहे. तर (गाडी क्रमांक ०२७१६) ही अप मार्गावरील गाडी जळगावला सकाळी पावणेसात वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार पहाटे ५ वाजता येणार आहे. तसेच पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०१०७७) ही डाउन मार्गावरील गाडी जळगावला रात्री साडेबारा वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार रात्री दीड वाजता येणार आहे. तर (गाडी क्रमांक ०१०७८) ही अप मार्गावरची ही गाडी जळगावला सकाळी ६ वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार सकाळी सव्वासात वाजता येणार आहे. तर, गोरखपूर-कुशीनगर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०१०१५) ही डाउन मार्गावरची गाडी जळगावला रात्री पावणेआठ वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार सायंकाळी सव्वासात वाजता येणार आहे. तर, (गाडी क्रमांक ०१०१६) ही अप मार्गावरील गाडी जळगावला पहाटे सव्वाचार वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार पहाटे साडेपाच वाजता येणार आहे. दरम्यान, सध्या ही गाडी नव्या वेळापत्रकानुसारच धावत असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.