शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस : रूपे अगाध तुझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:57 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये प्रासंगिक या सदरात साहित्यिक जिजाबराव वाघ यांनी पावसाचे काव्यरूपी केलेले वर्णन.

पाऊस... ओल्या नक्षत्रांचे घमघमणारे आभाळ... नवसृजनाची प्रतिभागंधीत माळ... पावसाची रुपेही अगाध. तप्त धरतीची कुस उजवून तिची हिरवी ओटी भरणारा... मन मातीवर थेंब ओल्या शब्दांची अलवार रांगोळी रेखाटणारा. समस्त कवी कुलास तर पावसाची अगणित रूपे करतात भावविभोर. आयुष्याच्या शुष्क फेसबुक अन् व्हॉटसअपच्या पदरावर चिंब प्रतिमांचे मोर चितारुन... पाऊस तनमनाला कवेत घेतो. रोमांचित करतो..! भरल्या आभाळाच्या साक्षीनं शब्दांना ढगांचा आकार मिळतो. पावसाचा प्रवास अदिम. अनादी आणि अनंतही. स्थलकालानुसार कवींच्या शब्दांमधून पाझरलेल्या पावसाची काही लडीवाळ तर काही फटकारे मारणारी रूपे. आनंदाचा हंगाम देऊन भेटत राहतात दरवर्षी ताजेपणानं...ऊन जरा जास्त आहे. असं म्हणत दरवर्षी काहिली करणाऱ्या दिवसात रुतूचक्राभोवती फिरणारी कालदर्शिकेची पानं पालटली जातात आपसुक. यातील चार पानं असतात पावसाळ्याची. म्हटलं तर नियतकाल. साधारण चार महिन्यांचा. उभ्या रानाला चिंब साज देणारा... इंद्रधनू पालखीचा... काळ्या-कभिन्न मेघांचा... गोंधलेल्या धरणीचा... कवी मनाला सृजनाचं दान देणारा...हा रुतू असतो पाऊस गाण्यांचा आणि कवितांचाही. पाऊस जसा गर्द मेघातून डोकावतो. तसा तो खूप प्राचीन म्हणून संतसाहित्यातूनही भेटतो. अर्थात यातील त्याची जातकुळी निराळी म्हणता येईल. अभंग, विराण्यांमधील त्याचं रुपदेखील वेगळं. संदर्भही वेगळे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा..’ अशा अध्यात्म लयीत पावसाला टिपलंय. भगवंताच्या भेटीची आस यातून स्वच्छ दिसते. वणवे पेटताय. सूर्य आग ओकतोय. काहिलीच्या तडाख्याने भाजून निघणाºया कवींसाठी पावसाची ओढ अनिवार अशीच. याच आळवणीतून केशवसुतांनी... ‘ऐशी होऊनिया दशा दिवस ते झाले बहु, पावसा ये आता तर तू, त्वरा करुनिया लंकेवरुनी असा. झंझावात यावरी बसुनिया या पश्चिमाब्धीवरी लाटा झोडित, गर्जना करित ये, बा मेघराजा, तरी...’ असं साकडं पावसाला घातलंय. आपला आर्तस्वर पावसाच्या कानापर्यंत पोहचलाय, असं वाटतं आणि आभाळ भरुनही येतं. कोणत्याही क्षणी त्याचा बांध फुटेल. इतकी दाटीवाटी असतानाही तो स्थिर चित्तच. पावसाचे हेच रुप आरती प्रभू...‘जमतें आहे ढगात पाणी,अजून परंतु ढगचि फुटेना, आणि विजेचा जराजराही त्या पाण्यातून देठ तुटेना...’ अशा हेकेखोर शब्दात पकडतात. शिगोशिग भरलेलं आभाळ कोसळलं की, ना.घ.देशपांडे यांच्यासारखा कवी...‘चिंब झाली पावसाने रानोवने, वर्षती येथे सखीची पावसाळी लोचने’ अशी ओली काजळरेषा उमटवून जातो. पावसाची ही धुंद सफर बा.भ.बोरकर गुढरम्य गुंजनात ऐकवून जातात. ती अशी... ‘मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधुन, वनात गेला मोर भिजून, घुमतो पांवा सांग कुठून?’ बा.भ.बोरकर यांचा हाच भाव पुढे नेताना मंगेश पाडगावकर लिहितात... ‘कोसळली सर दक्षिण उत्तर, घमघमले मातींतुनि अत्तर, अष्टदिशांतुन अभीष्टचिंतन, घुमला जयजयकार, पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार...’‘चिंब पावसानं रान झालं आबादानि' पावसाच्या कौतुक सोहळ्याचे असे ढोल वाजविणारी ना.धों.महानोर यांची कविता पावसाचे अनेकविध रंगही दाखवते... ‘पाऊस रात्रीचा कभिन्ह-माध्यान्ही धसमुसता, काळा, वैºयासारखा...’ असे भयकंपीत दर्शनदेखील महानोर यांची कविता घडविते. ‘बाई पाऊस पाऊस कोसळतो एकचित्त, खमंग लोणच्याशी हवा वाफेचाच भात...' पावसाची अशी साजूक सात्विकता इंदिरा संत यांच्या कवितांमधून भेटते. कोसळत्या पावसात आळवणी करताना ‘ग्रेस’ लिहून जातात... ‘पाऊस आला पाऊस आला गारांचा वर्षाव, गुरे अडकली रानामध्ये दयाघना तू धाव...’ अवलिया सुरेश भटांचा बाजच वेगळा. कडक तितकाच मऊसूत. ‘काळ्याकाळ्या मेघांआडुन, क्षणभर चमकुन गेली बिजली, जणू मोकळ्या केसांमधुनी, पाठ तुझी मज गोरी दिसली...’ भटांच्या गझलेतील हा रोमान्स मोहवून टाकतो.हरेक कवी, साहित्यिकाची अनुभूती देणारी वाट वेगळी असते. म्हणूनच नामदेव ढसाळ... ‘जारे जारे पावसा, तुला देतो पैसा... वादळी सामुद्रिकात शरणावत झोपड्यांची करवंदी कलेवरे...पावसाला पोळवा, पावसाला भाजवा, विस्तव आणा विस्तव पाडा...’ असं खणखणीत पावसालाच सुनावून टाकतात. खरंच पाऊस नसतो हळवा. दि.पु.चित्रे यांच्या कवितेतून ते ठाशीवपणे उमटते... ‘पाऊस पाऊस पाऊस, थेंबांचे तुटले ऊस, उघडा झाला माझा गळा, उफराटा उगवला मळा...’काळ बदलतोय. पावसाची रुपेही बदललीय. तथापि, त्याच्यातील सृजन पेरा मात्र कदापि लुप्त होणार नाही. तो अनादी आणि अदिम, अनंत असला तरी प्रत्येक रुतूत तो असतो मोहतुंबी. ताजाही. जोवर पाऊस आहे, तोवर शब्दांनाही ओल राहणारच. आॅनलाईन आणि आॅफलाईन युगातही त्याने आपली सादगी जपलीय चिरंतन...-जिजाबराव वाघ

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Chalisgaonचाळीसगाव